शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

भामा-भीमा नद्यांवरील १८ बंधारे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:20 IST

आंदोलकांचा विरोध झुगारून अखेर भामा-आसखेड धरणातून नदीपात्रात ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून भामा नदीवरील ८, तर भीमा नदीवरील १० असे एकूण १८ बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आसखेड : आंदोलकांचा विरोध झुगारून अखेर भामा-आसखेड धरणातून नदीपात्रात ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून भामा नदीवरील ८, तर भीमा नदीवरील १० असे एकूण १८ बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि. ९) सकाळी पावणेअकराच्या सुमारास धरणाच्या ‘आयसीपीओ’मधून नदीपात्रात ७५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, २४ तास सुमारे १५ दिवस पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे चाकणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.उन्हाळी आवर्तन सोडण्यास प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे उशीर झाला होता; परंतु सध्या भामा नदीपात्रात पाणी सोडल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागासह शिरूर व दौंड या तालुक्यांतील नागरिकांनी व शेतकºयांनीही समाधान व्यक्त केले आहे.भामा आणि भीमा नदीपात्रांत पाण्याचा खडखडाट व बंधाºयांतील पाणी संपत आल्याने नदीकाठच्या शेतकºयांची बागायती शेती अडचणीत येऊ लागली होती. याशिवाय, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर होती. २९ मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार १ एप्रिल रोजी पाणी सोडण्यात येणार होते; परंतु आंदोलकांनी अधिकाºयांना निवेदन देऊन ते थांबविले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भामा-आसखेड धरणातून प्रशासनाने पाणी सोडले. परंतु, आंदोलक त्यांच्या निर्णयावर ठाम होते; त्यामुळे चाहूल लागताच दुसºयाच दिवशी (दि. ६) हजारो प्रकल्पग्रस्त नागरिक करंजविहीरे येथे जमा झाले व त्यांनी धरण विभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांना निवेदन देऊन पाणी बंद करण्यास भाग पाडले. तत्कालीन परिस्थिती पाहून मेमाणे यांनी पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या; परंतु त्यानंतर दुसºयाच दिवशी सायंकाळी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध तक्रार दिली आणि पोलिसांनी १९ आंदोलकांसह अन्य ८० ते १०० जणांवर गुन्हा दाखल केला.सुमारे १३ ते १५ दिवस आवर्तन सुरू राहणार असून, त्यासाठी उपविभागीय अधिकारी राम पठारे, तहसीलदार सुनील जोशी, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, भामा-आसखेड धरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, भारत बेंद्रे, के. डी. पांडे, नरेंद्र धेंडे यांच्या निरीक्षणाखाली आवर्तन सुरू राहणार आहे.बंदोबस्त : सुमारे ८ ते १० पोलिसांचा ताफा दररोज धरणावर राहणार असून, त्यात एका पोलीस अधिकाºयाचाही समावेश असेल. चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी, पो.हा. संजय जाधव, पो.ना.संदीप रसाळ व सतीश जाधव, होमगार्ड आतिष शिंदे व मारुती केदारी यांचा ताफा सध्या तैनात आहे. आवर्तन बंद करेपर्यंत बंदोबस्त राहणार असल्याचेयादव यांनी सांगितले.