शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

भामा-भीमा नद्यांवरील १८ बंधारे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:20 IST

आंदोलकांचा विरोध झुगारून अखेर भामा-आसखेड धरणातून नदीपात्रात ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून भामा नदीवरील ८, तर भीमा नदीवरील १० असे एकूण १८ बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आसखेड : आंदोलकांचा विरोध झुगारून अखेर भामा-आसखेड धरणातून नदीपात्रात ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून भामा नदीवरील ८, तर भीमा नदीवरील १० असे एकूण १८ बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि. ९) सकाळी पावणेअकराच्या सुमारास धरणाच्या ‘आयसीपीओ’मधून नदीपात्रात ७५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, २४ तास सुमारे १५ दिवस पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे चाकणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.उन्हाळी आवर्तन सोडण्यास प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे उशीर झाला होता; परंतु सध्या भामा नदीपात्रात पाणी सोडल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागासह शिरूर व दौंड या तालुक्यांतील नागरिकांनी व शेतकºयांनीही समाधान व्यक्त केले आहे.भामा आणि भीमा नदीपात्रांत पाण्याचा खडखडाट व बंधाºयांतील पाणी संपत आल्याने नदीकाठच्या शेतकºयांची बागायती शेती अडचणीत येऊ लागली होती. याशिवाय, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर होती. २९ मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार १ एप्रिल रोजी पाणी सोडण्यात येणार होते; परंतु आंदोलकांनी अधिकाºयांना निवेदन देऊन ते थांबविले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भामा-आसखेड धरणातून प्रशासनाने पाणी सोडले. परंतु, आंदोलक त्यांच्या निर्णयावर ठाम होते; त्यामुळे चाहूल लागताच दुसºयाच दिवशी (दि. ६) हजारो प्रकल्पग्रस्त नागरिक करंजविहीरे येथे जमा झाले व त्यांनी धरण विभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांना निवेदन देऊन पाणी बंद करण्यास भाग पाडले. तत्कालीन परिस्थिती पाहून मेमाणे यांनी पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या; परंतु त्यानंतर दुसºयाच दिवशी सायंकाळी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध तक्रार दिली आणि पोलिसांनी १९ आंदोलकांसह अन्य ८० ते १०० जणांवर गुन्हा दाखल केला.सुमारे १३ ते १५ दिवस आवर्तन सुरू राहणार असून, त्यासाठी उपविभागीय अधिकारी राम पठारे, तहसीलदार सुनील जोशी, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, भामा-आसखेड धरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, भारत बेंद्रे, के. डी. पांडे, नरेंद्र धेंडे यांच्या निरीक्षणाखाली आवर्तन सुरू राहणार आहे.बंदोबस्त : सुमारे ८ ते १० पोलिसांचा ताफा दररोज धरणावर राहणार असून, त्यात एका पोलीस अधिकाºयाचाही समावेश असेल. चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी, पो.हा. संजय जाधव, पो.ना.संदीप रसाळ व सतीश जाधव, होमगार्ड आतिष शिंदे व मारुती केदारी यांचा ताफा सध्या तैनात आहे. आवर्तन बंद करेपर्यंत बंदोबस्त राहणार असल्याचेयादव यांनी सांगितले.