शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ टक्केच पाणी; दोन लाख ग्रामस्थांना झळ

By admin | Updated: April 19, 2016 01:07 IST

जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शिल्लक पाणीदेखील झपाट्याने कमी होत आहे.

पुणे : जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शिल्लक पाणीदेखील झपाट्याने कमी होत आहे. यामुळे १० जूनपर्यंत पिण्यासाठी नक्की किती पाणी लागणार असून शिल्लक पाणीसाठा किती आहे, याबाबत अत्यंत काटेकोर नियोजन करून दोन दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पाटबंधारे विभाग आणि पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांत ऐवढी भयानक पाणीटंचाई निर्माण झाली नाही ती या वर्षी झाली़ २५ धरणांपैकी ९ धरणे पूर्णपणे कोरडी पडली असून, केवळ २६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचा थेंब-थेंब जपून वापरण्याची गरज असून, त्याचे आत्ताच नियोजन करण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर कंद यांनी सोमवारी पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग व अन्य संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेत बैठक घेतली. या बैठकीत कंद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्ह्यात सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी किती पाणी पुरवठा आवश्यक आहे, आपतकालीन परिस्थितीत किती पाणी आवश्यक आहे, याची माहिती एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट व जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत नियोजन करण्यात येणार असल्याचे कंद यांनी सांगितले.