शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

१५ टक्केच पाणी; दोन लाख ग्रामस्थांना झळ

By admin | Updated: April 19, 2016 01:07 IST

जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शिल्लक पाणीदेखील झपाट्याने कमी होत आहे.

पुणे : जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शिल्लक पाणीदेखील झपाट्याने कमी होत आहे. यामुळे १० जूनपर्यंत पिण्यासाठी नक्की किती पाणी लागणार असून शिल्लक पाणीसाठा किती आहे, याबाबत अत्यंत काटेकोर नियोजन करून दोन दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पाटबंधारे विभाग आणि पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांत ऐवढी भयानक पाणीटंचाई निर्माण झाली नाही ती या वर्षी झाली़ २५ धरणांपैकी ९ धरणे पूर्णपणे कोरडी पडली असून, केवळ २६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचा थेंब-थेंब जपून वापरण्याची गरज असून, त्याचे आत्ताच नियोजन करण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर कंद यांनी सोमवारी पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग व अन्य संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेत बैठक घेतली. या बैठकीत कंद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्ह्यात सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी किती पाणी पुरवठा आवश्यक आहे, आपतकालीन परिस्थितीत किती पाणी आवश्यक आहे, याची माहिती एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट व जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत नियोजन करण्यात येणार असल्याचे कंद यांनी सांगितले.