शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

उसाचे १४ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप, साखर हंगामाचा पहिला महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:30 IST

साखर हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखान्यांनी मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर : साखर हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखान्यांनी मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले आहेत. तर ऊस उत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ व शेतकी विभाग रात्रंदिवस धडपडत आहे.राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन ऊसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत.त्यामुळे ऊस तुटून गेल्यानंतर गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. दरम्यान कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हताशी धरून बैठकांवर बैैठका घेत असून रोजची रणनीती आखत आहे. कारखान्यांनी सध्या सभासदांचा ऊस मागे ठेवत असून बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त मिळवता येईल याकडे कारखान्यांचे लक्ष लागले आहे. ऊसाचेअपुरे क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव याकडे जादागाळप करण्यासाठी कारखानेधडपडत होते.चालू हंगामात जो कारखाना जादा ऊसाचे गाळप करणार त्या कारखान्याला अधिक नफा होणार, त्यामुळे जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केली होती. अनेक कारखान्यांनी जागेवरच ‘काटा पेमेंट’ देण्याचे चालू केले आहे.बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने २ लाख ३७ हजार १६० मे. टन ऊसाचे गाळप करून २ लाख २६ हजार ८०० क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.विघ्नहर कारखान्याने १ लाख ७० हजार ६६० मे. टन ऊसाचे गाळप करून १ लाख ७४ हजार ६०० पोत्यांचे उत्पादन घेत दुसरा क्रमांक पटकाविला.१ लाख ५८ हजार ६०० मे. टन ऊसाचे गाळप करून १ लाख ६४ हजार ९०० पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर तिसºया क्रमांकावर आहे.यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने थंडीचे प्रमाण चांगले असल्याने ऊसाचा गोडवा वाढला होता. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर उतारा पावणेअकरा गेले आहेत. सर्व मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मे. टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाºया ‘हाय रिकव्हरी पिरियड’मध्ये जिल्ह्यातील अनेक कारखाने साखर उताºयात पावने अकरा टक्क्यांवर पोहचले आहेत. 

टॅग्स :Puneपुणे