शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उसाचे १४ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप, साखर हंगामाचा पहिला महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:30 IST

साखर हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखान्यांनी मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर : साखर हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखान्यांनी मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले आहेत. तर ऊस उत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ व शेतकी विभाग रात्रंदिवस धडपडत आहे.राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन ऊसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत.त्यामुळे ऊस तुटून गेल्यानंतर गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. दरम्यान कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हताशी धरून बैठकांवर बैैठका घेत असून रोजची रणनीती आखत आहे. कारखान्यांनी सध्या सभासदांचा ऊस मागे ठेवत असून बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त मिळवता येईल याकडे कारखान्यांचे लक्ष लागले आहे. ऊसाचेअपुरे क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव याकडे जादागाळप करण्यासाठी कारखानेधडपडत होते.चालू हंगामात जो कारखाना जादा ऊसाचे गाळप करणार त्या कारखान्याला अधिक नफा होणार, त्यामुळे जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केली होती. अनेक कारखान्यांनी जागेवरच ‘काटा पेमेंट’ देण्याचे चालू केले आहे.बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने २ लाख ३७ हजार १६० मे. टन ऊसाचे गाळप करून २ लाख २६ हजार ८०० क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.विघ्नहर कारखान्याने १ लाख ७० हजार ६६० मे. टन ऊसाचे गाळप करून १ लाख ७४ हजार ६०० पोत्यांचे उत्पादन घेत दुसरा क्रमांक पटकाविला.१ लाख ५८ हजार ६०० मे. टन ऊसाचे गाळप करून १ लाख ६४ हजार ९०० पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर तिसºया क्रमांकावर आहे.यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने थंडीचे प्रमाण चांगले असल्याने ऊसाचा गोडवा वाढला होता. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर उतारा पावणेअकरा गेले आहेत. सर्व मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मे. टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाºया ‘हाय रिकव्हरी पिरियड’मध्ये जिल्ह्यातील अनेक कारखाने साखर उताºयात पावने अकरा टक्क्यांवर पोहचले आहेत. 

टॅग्स :Puneपुणे