शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

पदरवाडीची १३ कुटुंबं जगापासून अलिप्त

By admin | Updated: July 5, 2017 02:35 IST

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या पश्चिमेला शेवटची वस्ती, भीमाशंकरपासून ७ कि.मी. गर्दराईत जेमतेम बारा ते तेरा घरे असलेले छोटे आदिवासीवस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कडेहणे : पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या पश्चिमेला शेवटची वस्ती, भीमाशंकरपासून ७ कि.मी. गर्दराईत जेमतेम बारा ते तेरा घरे असलेले छोटे आदिवासीवस्ती असलेले गाव. खाली खांडस-काठेवाडी, तर वर भीमाशंकर या दोन्हीच्या मध्ये सह्याद्रीच्या अजस्र डोंगराच्या कुशीत नव्हे कडेवर वसलेली १३ कुटुंबांची जगापासून अगदी अलिप्त वस्ती. डोंगराच्या मधोमध पदरात वसलेली वाडी म्हणून पदरवाडी हे नाव. दळणवळणाची सुविधा नसल्याने पदरवाडीच्या लोकांना खाली कोकणात जायचं असेल तर महाराष्ट्रात कोठेही नसेल असा जीवघेणा शिडी घाट किंवा गणेश घाट पार करण्यावाचून पर्याय नाही. तसं भीमाशंकरला जायला शिडी घाटाइतका अवघड मार्ग नसला तरी ५किमी दमछाक करणारे जंगल आणि डोंगराचा रस्ता. उदरनिर्वाहासाठी रोजची वणवण. भातपीक हे एकमेव उत्पन्नाचे साधन. भात व रानभाज्या हाच रोजचा आहार.रस्ता, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या सुविधांपासून कोसो दूर असलेली ही वस्ती मात्र केव्हाही कोसळणाऱ्या महाकाय डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. पायथा म्हणजे खाली असलेली कोकणकड्याची अजस्र कातळाची दरी. इतर वेळी लेकरा-बाळांचं पोट भरणारा गावाच्या वरचा हा डोंगर पावसाळ्यात पदरवाडीच्या या आदिवासी कुटुंबांना काळासमान वाटतो. भूस्खलनाच्या कोसळणाऱ्या संकटाच्या आपत्तीने घेरली गेलीली माणसं जीव मुठीत धरून दिवस ढकलत आहेत . येथील गोविंद डामसे, भामा काठे, भानुदास दिवारे व त्यांच्या कुटुंबाना पुनर्वसन करण्यासाठी अनेकदा आश्वासने दिली. परंतु कागदी घोडे नाचवण्याच्या शासनाची नेहमीच्या पद्धतीने या अदिवासी कुटुंबांचा जीव मात्र धोक्यात आला आहे.आमची ९ कुटुंबे, त्यांचा विस्तार धरून १३ झाली. आजपर्यंत सरकारचा माणूस आमच्या दारात उभा राहिला नाही. पाणी नाही, शाळा नाही,लाइट नाही. रस्ता तर कधीच मिळणार नाही. हे आम्हालाही माहीत आहे ; पण उभ्या डोंगराखाली इथं जीव कव्हा पण जाइल तवा सरकारनं कुठतरी याच रानात निवाऱ्याला घरं बांधून द्यावीत. शाळेतल्या पोरांना शाळा मिळावी बाकी आम्ही हे रान सोडून खाणार काय?- गोविंद डामसे, ज्येष्ठ नागरिक, पदरवाडी.