शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

१२३ विद्यार्थ्यांना प्रवेश

By admin | Updated: October 16, 2015 01:23 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र, अद्यापही उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दुसरी फेरी सुरू होणार कधी आणि प्रवेश होऊन मुले शैक्षणिक वर्षाला सुरुवात कधी करणार, याविषयीची चिंता पालकांमध्ये आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश देणे बंधनकारक असतानाही पुण्यातील १४ शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे एकूण ४०७ मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न रखडला होता. यासाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस त्यांना पर्यायी शाळा देण्यासाठी सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये बुधवारी ६५ जणांना प्रवेश दिला होता, तर गुरुवारी ५८ जणांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ५ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला. एकूण १२३ जणांना नवी शाळा मिळाली, तरीही शिक्षण हक्क कायद्यातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहीफळे म्हणाले, ‘‘गुरुवारअखेरपर्यंत १२३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे, तर ५ जणांनी प्रवेश नाकारला. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, शैक्षणिक सत्रातील पहिले ३ महिने उलटले तरी अद्याप पहिली फेरीच पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर, दुसरी फेरी जाहीर होऊन कधी पूर्ण होईल, याबाबत पालकांच्या मनात शंका आहे.’’दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी झालेल्या उशिराला प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महावीर माने यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक अधिकारी जबाबदार आहेत. जर विद्यार्थ्यांना ८ दिवसांत प्रवेश दिला नाही, तर शाळांबरोबरच अधिकाऱ्यांबाबतही अवमान याचिका दाखल करण्यात येईल. न्यायालयाचे आदेश असूनही तसेच याबाबत शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षण विभागाने कारवाईत दिरंगाई केल्याचे दिसून आले.