शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

१२३ विद्यार्थ्यांना प्रवेश

By admin | Updated: October 16, 2015 01:23 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र, अद्यापही उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दुसरी फेरी सुरू होणार कधी आणि प्रवेश होऊन मुले शैक्षणिक वर्षाला सुरुवात कधी करणार, याविषयीची चिंता पालकांमध्ये आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश देणे बंधनकारक असतानाही पुण्यातील १४ शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे एकूण ४०७ मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न रखडला होता. यासाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस त्यांना पर्यायी शाळा देण्यासाठी सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये बुधवारी ६५ जणांना प्रवेश दिला होता, तर गुरुवारी ५८ जणांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ५ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला. एकूण १२३ जणांना नवी शाळा मिळाली, तरीही शिक्षण हक्क कायद्यातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहीफळे म्हणाले, ‘‘गुरुवारअखेरपर्यंत १२३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे, तर ५ जणांनी प्रवेश नाकारला. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, शैक्षणिक सत्रातील पहिले ३ महिने उलटले तरी अद्याप पहिली फेरीच पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर, दुसरी फेरी जाहीर होऊन कधी पूर्ण होईल, याबाबत पालकांच्या मनात शंका आहे.’’दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी झालेल्या उशिराला प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महावीर माने यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक अधिकारी जबाबदार आहेत. जर विद्यार्थ्यांना ८ दिवसांत प्रवेश दिला नाही, तर शाळांबरोबरच अधिकाऱ्यांबाबतही अवमान याचिका दाखल करण्यात येईल. न्यायालयाचे आदेश असूनही तसेच याबाबत शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षण विभागाने कारवाईत दिरंगाई केल्याचे दिसून आले.