शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

१२३ विद्यार्थ्यांना प्रवेश

By admin | Updated: October 16, 2015 01:23 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र, अद्यापही उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दुसरी फेरी सुरू होणार कधी आणि प्रवेश होऊन मुले शैक्षणिक वर्षाला सुरुवात कधी करणार, याविषयीची चिंता पालकांमध्ये आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश देणे बंधनकारक असतानाही पुण्यातील १४ शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे एकूण ४०७ मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न रखडला होता. यासाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस त्यांना पर्यायी शाळा देण्यासाठी सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये बुधवारी ६५ जणांना प्रवेश दिला होता, तर गुरुवारी ५८ जणांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ५ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला. एकूण १२३ जणांना नवी शाळा मिळाली, तरीही शिक्षण हक्क कायद्यातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहीफळे म्हणाले, ‘‘गुरुवारअखेरपर्यंत १२३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे, तर ५ जणांनी प्रवेश नाकारला. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, शैक्षणिक सत्रातील पहिले ३ महिने उलटले तरी अद्याप पहिली फेरीच पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर, दुसरी फेरी जाहीर होऊन कधी पूर्ण होईल, याबाबत पालकांच्या मनात शंका आहे.’’दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी झालेल्या उशिराला प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महावीर माने यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक अधिकारी जबाबदार आहेत. जर विद्यार्थ्यांना ८ दिवसांत प्रवेश दिला नाही, तर शाळांबरोबरच अधिकाऱ्यांबाबतही अवमान याचिका दाखल करण्यात येईल. न्यायालयाचे आदेश असूनही तसेच याबाबत शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षण विभागाने कारवाईत दिरंगाई केल्याचे दिसून आले.