शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कन्हैया कुमार डाव्यांची साथ सोडणार? नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

By बाळकृष्ण परब | Updated: February 16, 2021 10:12 IST

Will Kanhaiya Kumar leave the CPI : भाकपा नेते असलेल्या कन्हैया कुमार यांनी नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या अशोक चौधरी यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी भाकपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात एक प्रस्ताव पारित केला होतात्यापार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांची भेट झाल्याने या भेटीला अधिक महत्त्व आले आहेकन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही भेट अराजकीय असल्याचे म्हटले आहे

पाटणा - जेएनयूमधील आंदोलनानंतर केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील प्रमुख चेहरा बनलेले कन्हैया कुमार आणि भाकपामधील संबंध गेल्या काही काळात बिघडले आहेत. त्यातच आता भाकपा नेते असलेल्या कन्हैया कुमार यांनी नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या अशोक चौधरी यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कन्हैया कुमार हे डाव्यांची साथ सोडून जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे.काही दिवसांपूर्वी भाकपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात एक प्रस्ताव पारित केला होता. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाशी संबंधित एका अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या मारहाणीनंतर कन्हैयावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांची भेट झाल्याने या भेटीला अधिक महत्त्व आले आहे.दरम्यान, कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही भेट अराजकीय असल्याचे म्हटले आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात, त्यामुळे ही भेट झाल्याचे या सूत्रांनी म्हटले. मात्र भाजपाकडून राज्यमंत्री झालेल्या सुभाष सिंह यांनी या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी कन्हैया कुमारचा उल्लेख मानसिक रुग्ण असा केला असून, अशी भेट अयोग्य असल्याचे म्हटले आहे.याभेटीबाबत जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी सांगितले की, कन्हैया कुमार यांनी त्यांची विकृत विचारसरणी सोडली तर त्यांचे पक्षात स्वागत केले जाईल. राजकीय जाणकारांच्या मते कन्हैया कुमारची ही भेट म्हणजे विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या जेडीयूकडून राज्याच्या राजकारणात आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.कन्हैया कुमार याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मतदारसंघातून गिरिराज सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत गिरिराज सिंह यांनी कन्हैया कुमार यांचा दारुण पराभव केला होता.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारBiharबिहारPoliticsराजकारण