शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

राज्य संकटात असताना मुख्यमंत्री घरात; राष्ट्रपती राजवट लागू करा- खासदार नवनीत राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 19:51 IST

खासदार नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका; शरद पवारांच्या दौऱ्याचं कौतुक

नवी दिल्ली: राज्यातील कोरोना संकट हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी सांगितलं. राज्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून आहेत. ते मातोश्रीतून बाहेर पडायला तयार नाहीत. इतर मुख्यमंत्री जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत असताना उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानाबाहेर निघत नाहीत. त्यामुळेच राज्यातील परिस्थिती भीषण झाल्याचं त्या म्हणाल्या.तरुणांनो, लागा तयारीला! ठाकरे सरकार पोलीस खात्यातील साडे बारा हजार पदं भरणारपंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील कोरोना संकटात बाहेर पडत नसल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही राणा यांनी भाष्य केलं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल वेगळा असतो. इतर राज्यांचे मुख्यमंत्री जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आरोग्य व्यवस्था उत्तम राखण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र उद्धव ठाकरे घरातच बसले आहेत. ते मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका राणा यांनी केली. मंत्री बच्चू कडूंनी उडवली कंगना राणौतची खिल्ली; “ग्रामपंचायत निवडणुकीत उभी राहिली तरी...”राज्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभेत करणार आहे. राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा ताबा केंद्रानं घ्यावा. त्याशिवाय स्थिती सुधारणार नाही, असं त्या पुढे म्हणाल्या. उद्धव यांच्यावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. शरद पवार एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते ८० वर्षांचे आहेत. मात्र या परिस्थितीतही ते राज्यभर फिरतात. विविध जिल्ह्यांचा आढावा घेतात, असं राणा यांनी म्हटलं.सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रगचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार रडारवर आहेत. यावरून लोकसभेतही वादळी चर्चा सुरू आहे. त्यावर राणा यांनी भाष्य केलं. 'संपूर्ण इंडस्ट्री तशी नाही, याची मला जाण आहे. मीदेखील इंडस्ट्रीत काम केलं आहे. पण अनेक मोठ्या कुटुंबातील कलाकार ड्रग्ज घेतात. काही वर्षांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात क्रिकेटपटूंची नावंदेखील यामध्ये समोर आली होती. त्यामुळे काहींवर आजीवन बंदी घातली गेली,' असं राणा म्हणाल्या.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा