शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

West Bengal Election : "पश्चिम बंगालच्या लोकांना उत्तम प्रशासन हवं; सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी, हिंसाचाराला लगाम घालणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 19:15 IST

West Bengal Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवाद

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवादकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकांमुळे रॅली केल्या होत्या रद्द

सध्या देशात कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच उच्चस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला. दरम्यान, आपण त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही याबाबत त्यांनी लोकांसमोर खंत व्यक्त केली. "सकाळपासूनच मी अनेक बैठकांमध्ये व्यग्र होतो. कोरोनाच्या कारणामुळे मी तुमच्यापर्यंत थेट पोहोचू शकलो नाही याचं मला दु:ख आहे. परंतु या ठिकाणी फार कमी लोकं आहेत. सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. "भाजपचं डबल इंजिन सरकार बंगालच्या विकासात कोणतीही कसर राहू देणार नाही. बंगालच्या लोकांना उत्तम शासन हवं आहे. सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी आणि हिंसाचारावर लगाम घातला जाईल. बंगालच्या लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं जाईल," असं मोदी यावेळी म्हणाले. "बंगालची जनता चांगल्या प्रशासनासाठी मतदान करत आहे. बंगालमधील जनता शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी आग्रही आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता दक्षिण येथील आपल्या रॅली रद्द केल्या होत्या.

ममता बॅनर्जींनी साधला होता मोदींवर निशाणाकोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हे पंतप्रधान मोदीनिर्मित संकट असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचारसभेदरम्यान त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. सात महिन्यांअगोदर केंद्राने म्हटले होते की, कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. एकीकडे देशात लसी, ऑक्सिजनची कमतरता आहे. दुसरीकडे लसी व औषधे बाहेरील देशांत पाठविली जात आहेत. निवडणुकीत भाजप दुसऱ्या राज्यांतून लोक बंगालमध्ये आणत आहे आणि त्यामुळे संसर्ग वेगाने पसरत आहे. म्हणून याला पंतप्रधाननिर्मित संकटच म्हणावे लागेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, डावे पक्ष व आयएसएफच्या आघाडीला मतं देणे म्हणजे भाजपला आणखी मजबूत करण्यासारखे आहे, असा दावादेखील त्यांनी केला होता.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021