शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

West Bengal Election : "पश्चिम बंगालच्या लोकांना उत्तम प्रशासन हवं; सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी, हिंसाचाराला लगाम घालणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 19:15 IST

West Bengal Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवाद

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवादकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकांमुळे रॅली केल्या होत्या रद्द

सध्या देशात कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच उच्चस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला. दरम्यान, आपण त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही याबाबत त्यांनी लोकांसमोर खंत व्यक्त केली. "सकाळपासूनच मी अनेक बैठकांमध्ये व्यग्र होतो. कोरोनाच्या कारणामुळे मी तुमच्यापर्यंत थेट पोहोचू शकलो नाही याचं मला दु:ख आहे. परंतु या ठिकाणी फार कमी लोकं आहेत. सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. "भाजपचं डबल इंजिन सरकार बंगालच्या विकासात कोणतीही कसर राहू देणार नाही. बंगालच्या लोकांना उत्तम शासन हवं आहे. सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी आणि हिंसाचारावर लगाम घातला जाईल. बंगालच्या लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं जाईल," असं मोदी यावेळी म्हणाले. "बंगालची जनता चांगल्या प्रशासनासाठी मतदान करत आहे. बंगालमधील जनता शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी आग्रही आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता दक्षिण येथील आपल्या रॅली रद्द केल्या होत्या.

ममता बॅनर्जींनी साधला होता मोदींवर निशाणाकोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हे पंतप्रधान मोदीनिर्मित संकट असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचारसभेदरम्यान त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. सात महिन्यांअगोदर केंद्राने म्हटले होते की, कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. एकीकडे देशात लसी, ऑक्सिजनची कमतरता आहे. दुसरीकडे लसी व औषधे बाहेरील देशांत पाठविली जात आहेत. निवडणुकीत भाजप दुसऱ्या राज्यांतून लोक बंगालमध्ये आणत आहे आणि त्यामुळे संसर्ग वेगाने पसरत आहे. म्हणून याला पंतप्रधाननिर्मित संकटच म्हणावे लागेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, डावे पक्ष व आयएसएफच्या आघाडीला मतं देणे म्हणजे भाजपला आणखी मजबूत करण्यासारखे आहे, असा दावादेखील त्यांनी केला होता.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021