शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

श्रीरामाचे नाव आम्ही कोणावरही थोपविलेले नाही;पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 08:18 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले.

सचिन लुंगसे लखनऊ : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधील शाब्दिक संघर्ष टोकाला गेला असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. आम्ही रामाचे नाव कोणावरही थोपविले नाही. थोपविणार नाही, असे ते म्हणाले. भाजपवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२४ जानेवारी, उत्तर प्रदेश दिनानिमित्त लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी मुंबई, दिल्ली, कोलकातास्थित पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कित्येक वर्षांपासून सुरू असलेला अयोध्या वाद संपला आहे. अयोध्या बदलत आहे. उत्तर प्रदेश बदलत आहे. पायाभूत सेवा सुविधा विकसित होत आहेत. आम्ही पूर्वांचल एक्स्प्रेस हायवेसारखा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण चार एक्स्प्रेस हायवे बांधले जात आहेत. यामुळे येथे औद्योगिक क्षेत्र विकसित होईल. व्यापार आणि रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. स्थानीक गुंतवणूक तसेच परदेशी गुंतवणूक व्हावी म्हणून काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे. आम्ही चार वर्षे वादाशिवाय पूर्ण केली. केंद्र, राज्याच्या योजना लोकांपर्यंत पाेहाेचत आहेत. दारूमुक्त उत्तर प्रदेशसाठी, शेतकरी प्रश्न सोडण्यासाठी काम करत आहोत, असे ते  म्हणाले. उत्तर प्रदेशमधील नागरिकांना येथे रोजगार मिळावा म्हणून काम केले जात असून, येथील ७५ जिल्ह्यांतून ७५ प्रकारच्या उत्त्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी उत्तर प्रदेश दिनासह विविध कार्यक्रमातून प्रयत्न केले जात आहेत. येथील पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालyogi adityanathयोगी आदित्यनाथ