शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्मिलाच्या प्रवेशामुळे भाजपपुढे तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:55 IST

राड्यामुळे वाढली चुरस; एकतर्फी लढत होण्याचे अंदाज मिळाले धुळीस

- सचिन लुंगसे२०१४ मध्ये चार लाखांच्या मताधिक्याने जिंकलेले भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना या वेळी आव्हान दिले आहे ते अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी.शेट्टी यांच्याकडे अनुभव, संघटनात्मक ताकद असली, तरी निवडणुकीच्या रिंगणात आयत्यावेळी उतरलेल्या ऊर्मिला मांडत असलेले मुद्दे, त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी दोनदा राडा केल्याने त्या पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे ही लढत एकतर्फी न होता, चुरशीची होईल, असे स्पष्ट दिसू लागले आहे.काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांच्या कुटुंबाची वैचारिक बैठक, सामाजिक कामाबद्दल असलेली जाण, विषय-मुद्दे मांडण्याची हातोटी यामुळे; तसेच अभिनेत्री असल्याने त्यांच्याविषयी आकर्षण आहे. ते त्यांच्या प्रचारसभा-चौकसभांत दिसते. मनसेसारख्या मुंबईत सतत चर्चेत असलेल्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. त्या पक्षाच्या मतदाराने खरोखरीच मातोंडकर यांना बळ दिले आणि त्याचपद्धतीने आघाडीतील राष्ट्रवादीनेही काम केले, तर शेट्टी यांचे मताधिक्य दीड-दोन लाखांनी घटू शकते, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा आहे. सर्वसामान्यांत मिसळणे, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा, झोपड्यांसह कच्च्या वस्त्यांतील मुद्दयांची हाताळणी, त्याचवेळी उच्चभ्रू मतदारांना दिलेला विश्वास, रेल्वेसह अन्य प्रवाशांच्या प्रश्नांबाबत चर्चा या पद्धतीने त्यांच्या प्रचाराची आखणी दिसून येते.भाजपच्या संघटनात्मक ताकदीपेक्षा उर्मिला यांचे मुद्दे, ग्लॅमर सरस ठरू लागताच त्यांच्या प्रचारसभेत दोन वेळा घुसून भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ, त्यावरील आरोप-प्रत्यारोप यामुळे ही निवडणूक भाजपसाठी एकतर्फी उरलेली नाही, हे स्पष्ट दिसते. त्यामुळे मतदार बॉलीवूडला प्राधान्य देतात की, आहे त्याच उमेदवाराचा पुन्हा विचार करतात यावर येथील निकाल अवलंबून आहे.हिंमत असेल तर केलेल्या कामाच्या बळावर, मेरिटवर निवडणूक लढवावी. काँग्रेसला आता लक्षात आले आहे की, त्यांचे डिपॉझिटही वाचणार नाही. या मतदारसंघातील लोक समजूतदार आहेत. कोण खरे आणि कोण खोटे? हे सगळे लोकांना कळते आहे. देश मोदीमय झाला आहे. त्याचा फायदा मिळेल.- गोपाळ शेट्टी, भाजप.पाच वर्षांत देशातील वातावरण कमालीचे वाईट झाले आहे. या परिस्थितीत माझे काम, मला मिळणारा पाठिंबा हेच माझ्या विरोधकांना उत्तर आहे. भावनिक मुद्दे हाताळणे ही कामे भाजपची आहेत. मागील साडेचार वर्षांत त्यांनी हे काम उत्तम केले आहे. मी माझ्या आताच्या कामावर विश्वास ठेवते.- ऊर्मिला मातोंडकर, काँग्रेसकळीचे मुद्देझोपड्यांच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर ऊर्मिला यांनी शेट्टी यांना कोंडीत पकडले आहे. त्या मतदारावर लक्ष केंद्रित केले आहे.पश्चिम उपनगरातील रेल्वेचे न सुटलेले प्रश्न, हव्या त्या प्रमाणात न मिळालेल्या सुविधाही मतदारांच्या केंद्रस्थानी आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरGopal Shettyगोपाळ शेट्टीmumbai-north-pcमुंबई उत्तर