शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढल्यास सत्य समोर येईल : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 21:01 IST

Politics HasanMusrif Kolhapur : देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. जनगणनेचा अहवाल २०१४ पासून केंद्र सरकार देण्यास तयार नाही. त्यामुळेच आरक्षणाचे भिजत घोंगडे पडले असून या प्रकरणात नेमके कोणाची चुक आहे, हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवी, यासाठी ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण संबंधित मंत्र्यांकडे केल्याची माहीती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढल्यास सत्य समोर येईल : मुश्रीफ फडणवीस यांच्या काळातच आरक्षणाचा बट्ट्याबोळ

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. जनगणनेचा अहवाल २०१४ पासून केंद्र सरकार देण्यास तयार नाही. त्यामुळेच आरक्षणाचे भिजत घोंगडे पडले असून या प्रकरणात नेमके कोणाची चुक आहे, हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवी, यासाठी ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण संबंधित मंत्र्यांकडे केल्याची माहीती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्ही नारायण राणे समिती नेमली ती आमची चूक होती. त्यानंतर १०२ घटना दुरुस्तीनंतर मराठा आरक्षणाचा राज्याला अधिकार नसताना ते देवेंद्र फडणवीस यांनी दिले, ही त्यांची चुकी होती. आता कोणाच्या चुका काढत बसण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोघांनी एकत्र आले पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा तर खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच बट्ट्याबोळ झाला.

मंत्री छगन भुजबळ यांनी परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीत सगळा पर्दाफाश केला आहे. २०१० साली कृष्णमूर्तींच्या केसमध्ये ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल देण्यात आला. त्यानंतर २०११ ला जनगणना झाली आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे असून २०१४ पासून हा अहवाल भाजप देण्यास तयार नाही. हा अहवाल नसल्याने आरक्षणाचा पेच निर्माण झाला. वास्तविक मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे केले असते तर हा दिवस आला नसता. निति आयोग व जनगणना आयुक्त एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत, त्यामुळे एकदाची श्वेतपत्रिका काढावी, यामध्ये नेमके दोषी कोण आहेत, हे जनतेसमोर जाईल.

केंद्रीय तपास यंत्रणेबाबत आपण अनेक वेळा शंका व्यक्त केल्या आहेत. माजी पोलीस महासंचालकांनी एका वृत्तपत्रातील अग्रलेखातही सचिन वाझे व शर्मा हे कसे सेवेत आले, एकमेकांना कसे वाचवले, त्यांचे कारनाम्याबाबत उघड लिहिले आहे. अंबानीच्या घरासमोरील स्फोटके कोणी व कशासाठी ठेवली याचा लवकरात लवकर पर्दाफाश व्हायला हवा, अशी आपली मागणी असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.फडणवीसांनी पुणे मनपातील वाझे शोधावेतराज्य सरकारमधील प्रत्येक विभागात एक वाझे असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केल्याबद्दल विचारले असता, कदाचित फडणवीस यांना पंचांगवाल्यांनी सांगितले होते की काय हे माहिती नाही, मात्र ते तीन आठवड्यांनी बोलले. त्यांच्या ताब्यात असणाऱ्या पुणे महापालिकेत आंबिल ओढा येथील प्रकरण घडले. त्यामुळे फडणवीस यांनी अगोदर पुणे महापालिकेतील वाझे शोधावेत, मग इतर विभागाचकडे यावे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.पडळकर अर्ध्या हळकुंडानी पिवळे होणारेआमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील टीकेबाबत विचारले असता, पडळकर हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आहेत. त्यांच्या बोलण्याकडे कोणी गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफDevendradada Deshmukhदेवेंद्रदादा देशमुखkolhapurकोल्हापूर