शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

...म्हणून दोन टक्केवाला ब्राह्मण असूनही राजकारणात टिकलो, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं गुपित

By बाळकृष्ण परब | Updated: January 13, 2021 23:53 IST

Devendra Fadnavis News : दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजातून येऊनही राजकारणात कसा टिकलो, त्याचे गुपित देवेंद्र फडणवीसांनी आज सांगितले.

ठळक मुद्देसमाजासमोर आव्हाने येतील त्या त्या वेळी या आव्हानांचा सामना कसा करायचा याचा विचार करावा लागेलजेव्हा जेव्हा देशाने आपलं पुरोगामित्व गमावलं. त्या त्या वेळी ते पुरोगामित्व परत मिळवण्यासाठी ब्राह्मण समाजातील लोक अग्रेसर झालेजर आपण समाजोपयोगी कामं केली तर लोकं डोक्यावर घेतात. पुढारीपण देतात

नाशिक - जेव्हा जेव्हा देशाने आपलं पुरोगामित्व गमावलं. त्या त्यावेळी हे पुरोगामित्व टिकवण्यासाठी ब्राह्मण समाजातील लोक आघाडीवर राहिले. तसेच त्यांनी ही पुरोगामित्वाची चळवळ ब्राह्मणांनी टिकवली, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजातून येऊनही राजकारणात कसा टिकलो, त्याचे गुपितही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

 देशस्थ ऋग्वेदी संस्था आयोजित ऋग्वेद सभागृहाच्या उदघाटन सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजाला समाजाचा विचार बनावा लागेल. ज्या ज्या वेळी समाजासमोर आव्हाने येतील त्या त्या वेळी या आव्हानांचा सामना कसा करायचा याचा विचार करावा लागेल. देशाचा इतिहास पाहिल्यास, जेव्हा जेव्हा देशाने आपलं पुरोगामित्व गमावलं. त्या त्या वेळी ते पुरोगामित्व परत मिळवण्यासाठी ब्राह्मण समाजातील लोक अग्रेसर झाले. त्यांनी पुरोगामित्वाची चळवळ देशात चालवली. ही एक ऐतिहासिक स्वरूपाची देणगी आपल्याला मिळाली आहे. ही घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे.

यावेळी फडणवीस यांनी एक राजकीय किस्साही सांगितला. ते म्हणाले की, एकदा माझा एक मित्र म्हणाला की, हल्ली राजकारणात जातीपातीचं प्रस्थ खूप वाढले आहे. तुम्ही दोन टक्क्याचे ब्राह्मण मग तुम्ही कसे काय राजकारणात टिकणार. त्यावर मी म्हणालो की, अतिशय सोपं आहे. दोन टक्क्याच्या ब्राह्मणांनी जर ९८ टक्क्यांसोबत मिसळून गेले तर १०० टक्क्यांचे होतील. अशाच प्रकारे जर आपण समाजोपयोगी कामं केली तर लोकं डोक्यावर घेतात. पुढारीपण देतात. त्यामुळे समाजाच्या उपयोगी पडण्याचा विचार आपण केला पाहिजे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण