शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: आगामी काळात शिवसेनेला मोठा फटका बसणार; नाराज नेते बंड करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:30 IST

राज्यातील अनेक शिवसेनेचे नेते,पदाधिकारी नाराज आहेत. त्यांची ही नाराजी हळूहळू बाहेर येण्याची शक्यता दिसत आहे. त्याचा फटका आगामी काळात बसण्याची दाट शक्यता आहे.

अल्पेश करकरे

मुंबई - नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. ३० डिसेंबरला महाविकास आघाडी सरकार तीन पक्ष एकत्र येत मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात शिवसेनेने जेष्ठ नेत्यांना डावल्यामुळे, तसेच आता पक्षश्रेष्ठी आपल्या मताला किंमत देत नाहीत आणि आपली काम होत नाहीत त्यामुळे नाराज नेत्यांची संख्या शिवसेनेत मोठी आहे. उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री असूनही  सरकारमध्ये कामं होत नाहीत, जुन्या जाणत्या नेत्यांचा पदरी काहीच नसल्याने आणि अनेक समस्यांनी शिवसेनेत दबक्या आवाजात नाराजी धुमसतेय. याचाच फटका आगामी राजकारणात शिवसेनेला पुढे बसण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

नुकतच माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला मनातील सगळी व्यथा व्यक्त केली. माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, माजी जलसंपदा मंत्री तानाजी सावंत, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत या जुन्या जाणत्या नेत्यांना मविआ सरकार पासून दूरच ठेवण्यात आलं आहे. पक्षातून आता काहीही किंमत मिळत नसल्याने त्यांची कुचबुज सुरू आहे हे सर्वश्रुत आहे. सरकार स्थापन होताच नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली. त्यामुळे भास्कर जाधव, तानाजी सावंत यांनी वेळोवेळी त्यांच्या कृतीतून ते नाराज असल्याचं दाखवूनही दिलं. यानंतर आता दोन वर्षांनी थेट रामदास कदम यांनी आपली खंत मांडली. त्यातच आता राज्यातील अनेक शिवसेनेचे नेते,पदाधिकारी नाराज आहेत. त्यांची ही नाराजी हळूहळू बाहेर येण्याची शक्यता दिसत आहे. त्याचा फटका आगामी काळात बसण्याची दाट शक्यता आहे.

नाराज नेते स्वत:चा मार्ग निवडणार 

सत्ता नसतांना नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जातात यात नवीन काही नाही. मात्र गेल्या दोन वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे. मुख्यमंत्रिपद आहे पण तरीही शिवसेनेमधील जेष्ठ शिवसैनिक, उपनेते, कार्यकर्ते एक तर पक्ष सोडून जात आहेत किंवा आपली नाराजी विविध मार्गांनी व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. त्यानंतर सुद्धा शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून गेले आहे. त्यात आता आणखी शिवसेनेत नेतेमंडळी नाराज आहेत ते आपला मार्ग शोधत आहेत. आगामी महापालिका, नगरपरिषद ,पंचायतीच्या निवडणुका आहेत त्यात नाराज मंडळी आपला मार्ग शोधतील का हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या नेत्यांनी दोन वर्षात शिवसेना सोडली 

राज्यात दोन वर्षात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला अनेक नेत्यांनी जय महाराष्ट्र केला आहे. त्यात माथाडी कामगार नेते मत नरेंद्र पाटील यांनी मार्च महिन्यात शिवाबंधन सोडत अखेर जय महाराष्ट्र करत शिवसेना सोडली. महाविकास आघाडी सरकार येऊन दीड वर्ष होत आले तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडवले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ मागूनही ते भेटत नाही. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले होते. माजी मंत्री व शिवसेना उपनेते अशोक शिंदे आणि ठाण्याचे सुरेश म्हात्रे  यांनीही स्थानिक पातळीवर डावलण्यात येत असल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. तसेच माजी आमदार सुभाष साबणे यांनी देखील काही महिन्यांपूर्वी आघाडी सरकारमधील मित्र पक्षाच्या राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच महत्वाचे म्हणजे राज्यात अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांनी ही विविध पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे.

आता शिवसेनेत सध्या नाराज नेते कोण ?

सत्तेत आल्यानंतर तीन पक्षांचा सरकार असल्यामुळे शिवसेनेवर सध्या मंत्रीपदांच्या संख्येची बंधन आहेत. फडणवीस सरकारमध्ये असताना ही संख्या जास्त होती. परिणाम शिवसेनेत सध्या नाराज नेत्यांची एक फळीच तयार झाली आहे.  यात मंत्रिपद न मिळाल्याने व पक्षश्रेष्ठी ऐकत नसल्याने प्रताप सरनाईक, दीपक केसरकर, दीपक सावंत, रामदास कदम, रवींद्र वायकर,आशिष जयस्वाल, तुकाराम काते आणि अनेक नेते नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच स्थानिक पातळीवर काम होत नसल्याने आणि जुन्या जाणत्याना डावलल्यामुळे जिल्हाध्यक्ष व उपजिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक देखील नाव न घेण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त करत आहेत.

नाराजीची कारणे काय ?

कार्यकर्त्यांपासून पक्ष हा मोठा होत असतो. कार्यकर्ते पक्षाला सत्तेत बसवतात, तसंच खालीही उतरवण्याची ताकद ठेवतात. शिवसेनेत सध्या कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींना बरोबर थेट संवाद होत नसल्यामुळे आणि मार्गदर्शन होत नसल्याने नाराज आहेत. आपला पक्ष राज्यात सत्तेत असतानाही स्थानिक पातळीवर निधी मिळत नसल्याने अनेक नेते नाराज आहेत. तसेच जुने जाणते नेते पक्षात व सत्तेत महत्वाचं पद नसल्याने नाराज आहेत. तसेच पक्षात काही मोजक्याच नेत्यांचा बोलबाला आहे आणि ते नेते आपल्या सोयीनुसार राजकारण करत असल्याने कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत. जुन्या नेत्यांना पक्षप्रमुखांची थेट संवाद साधता येत नाही त्यामुळे देखील नाराजी आहे. स्थानिक पातळीवर आघाडीच्या इतर पक्षांमुळे अनेकांची कोंडी होत आहे त्यामुळेही नाराजी आहे अशी सर्व माहिती जुने शिवसैनिक आणि नेते यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदम