शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"राजकारणातली निवृत्ती"

By admin | Updated: June 7, 2016 00:00 IST

सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोचे माजी सदस्य आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धादेब भट्टाचार्य सध्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. २४ वर्ष २०११ पर्यंत ते जाधवपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २००० ते २०११ पर्यंत त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद भूषवले.३१ वर्ष परराष्ट्र सेवेत काम केल्यानंतर नटवर सिंह यांनी १९८४ साली राजीनामा देऊन काँग्रेस ...

सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोचे माजी सदस्य आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धादेब भट्टाचार्य सध्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. २४ वर्ष २०११ पर्यंत ते जाधवपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २००० ते २०११ पर्यंत त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

३१ वर्ष परराष्ट्र सेवेत काम केल्यानंतर नटवर सिंह यांनी १९८४ साली राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २००४ साली काँग्रेसप्रणीत संपुआचे सरकार आल्यानंतर त्यांना परराष्ट्रमंत्री बनवण्यात आले. त्यांची गांधी घराण्याशी जवळीक होती. पण त्यांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ १८ महिन्यांचा होता. तेल घोटाळयात नाव आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नटवरसिंह सक्रीय राजकारणापासून दुरावले.

आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक असणारे गोविंदाचार्य १९८८ मध्ये भाजपचे सदस्य झाले. २००० सालापर्यंत ते पक्षाचे सरचिटणीस होते. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला तो कायमचाच.

जसवंत सिंह काहीवर्षांपूर्वी भाजपाचे महत्वाचे नेते होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयासह महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद भूषवले. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करुन राजस्थानमध्ये स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. ऑगस्ट २०१४ मध्ये घरात पडून ते जखमी झाले. त्यानंतर जसवंत सिंह राजकारणापासून दुरावले.

भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचवणारे अटलबिहारी वाजपेयी आज वृद्धपकाळामुळे राजकारणातून निवृत्त झाले आहेत. वाजपेयी देशाचे १० वे पंतप्रधान आहेत.

माजी खासदार गुरुदास कामत मुंबई काँग्रेसचे वजनदार नेते आहेत. गुरुदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी सामाजिक कार्य सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गांधी घराण्याच्या अत्यंत निकटवर्तीय असणा-या गुरुदास कामत यांचा राजकीय निवृत्तीचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे.