शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

भाजपला मदत करणारे अधिकारी तातडीने दूर करा; काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीतील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:38 IST

तिघांनीही एकत्र येऊन लढा, बैठकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असून मुख्यमंत्र्यांना देखील देणार आहे असे सांगण्यात आले.

अतुल कुलकर्णीमुंबई : महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे आहे. तिघांनी एकत्र येऊन संकटांना सामोरे गेले पाहिजे. एकटे लढल्यामुळे जो परिणाम असायला हवा तो साधला जाणार नाही. तसेच भाजपशी जवळीक असणारे अधिकारी शोधून तातडीने दूर करावेत, असा सूर काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत उमटला. 

बैठकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असून मुख्यमंत्र्यांना देखील देणार आहे असे सांगण्यात आले. आम्ही आढावा बैठक घेतली आहे एवढा संदेश आमच्या मित्रपक्षांना पुरेसा आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने बोलताना स्पष्ट केले. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. सरकारवर ज्या पद्धतीने भाजप हल्ला चढवत आहे, तो पाहता या राजकीय हल्ल्यांना एकत्रितपणे उत्तर देण्याची गरज आहे. मात्र तसे न होता ज्या पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप होत आहेत, त्या पक्षाचे मंत्री उत्तर देताना दिसत आहेत. धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्या प्रकरणात हेच दिसून आले. आता अनिल देशमुख प्रकरणाची बाजूदेखील राष्ट्रवादीचे नेते मांडताना दिसत आहेत. हे होऊ द्यायचे नसेल आणि एकत्रितपणे सगळ्यांचे सरकार आहे असे दाखवायचे असेल तर विश्वासात घेऊन रणनीती ठरवावी लागेल, असेही बैठकीत चर्चेला आले.

अधिकारी भाजपला माहिती देतातसरकार बदलले तरी भाजपशी जवळीक असणारे अनेक अधिकारी आजही महत्त्वाच्या पदावर आहेत. त्या अधिकाऱ्यांना तातडीने बदलण्याची गरज आहे. तसे बदल केले नाही तर हे अधिकारी सरकारमधील माहिती भाजपाला देतील. सातत्याने हेच होत आल्याचे दिसत आहे. त्यामुळे असे अधिकारी शोधून तातडीने त्यांना दूर करणे हा महत्त्वाचा विषय मुख्यमंत्र्यांनी हातात घ्यावा लागेल. अशीही चर्चा बैठकीत झाली. सर्व मंत्र्यांची मते आम्ही जाणून घेतली. आमचा अहवाल आणि केंद्र सरकारला पाठवू, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

समन्वय समितीवर भरराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांच्या पक्षाचे मंत्री जाऊन भेटतात. माहिती देतात, त्यात गैर काही नाही. मात्र तीनही पक्षांमध्ये वाद-विवाद झाल्यास किंवा सरकारवर काही गंडांतर आल्यास समन्वय समितीची बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा, असे सरकार स्थापन करताना ठरले होते. समन्वय समितीची बैठक तातडीने घेतली गेली पाहिजे. जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, याची वस्तुस्थिती सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन सांगितली पाहिजे, असेही काही मंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसsachin Vazeसचिन वाझे