शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुंबईकडे निघालेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी घरीच केले स्थानबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 06:13 IST

पोलीस आयुक्त कार्यालयात दोघांचाही ठिय्या

 लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा दाम्पत्याला मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना भेटण्यासाठी रविवारी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या घरी स्थानबद्ध केले. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात दोघांनी काही काळ ठिय्या दिला.

गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रास्ता रोको केल्याप्रकरणी शुक्रवारी आमदार राणा यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आधी जामीन न स्वीकारणाऱ्या आमदार राणा यांनी रविवारी जामीन घेतला. सायंकाळी विदर्भ एक्स्प्रेसने राणा दाम्पत्य शेतकरी कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना होणार होते. तत्पूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशानुसार राणा दाम्पत्याला मुंबई येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला.

राणा दाम्पत्याने जाण्याची भूमिका कायम ठेवल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४९ नुसार दोघांनाही त्यांच्याच घरी स्थानबद्ध केले. विदर्भ एक्स्प्रेस सुटेपर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांना सोडल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. परंतु, आम्ही पोलीस आयुक्तालयातच थांबू, अशी भूमिका या दाम्पत्याने रात्री ९.१५ वाजता घेतली. दरम्यान, नवनीत राणा यांच्या नेतृत्वात शनिवारी तुरुंगासमोर आणि रविवारी राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली. बडनेरा येथे विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढू पाहणाऱ्या काही कार्यकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा