शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रामटेकमध्ये भगवा की कडेलोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:23 IST

युतीमुळे शिवसेनेने निश्वास सोडला। काँग्रेसकडून वासनिक पुन्हा मैदानात

- जितेंद्र ढवळेएकेकाळी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी दोेन वेळा प्रतिनिधित्व केलेला रामटेक लोकसभा मतदार संघावर सध्या शिवसेनेचा ताबा आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला होता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड सर केला. वासनिक यांना तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभूत करीत रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकला. यावेळी रामटेकचा गड सर करण्यात कुणाला यश येते व कुणाचा कडेलोट होतो, याकडे वैदर्भीय जनतेचे लक्ष लध लागले आहे.१९७७ ते २०१४ या ३७ वर्षातील १२ निवडणुकांवर नजर टाकली तर आठ वेळा काँग्रेस पक्षाच्या आणि चार वेळा शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. या मतदारसंघात भाजपाचे प्राबल्य असल्याचा दाखला देत ही जागा ‘मोठा भाऊ’ म्हणून भाजपाला द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी करून सेनेला काही दिवसापूर्वी घाम फोडला होता. युती झाल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.जिल्हा परिषदेत युतीची सत्ता आहे. जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत आणि पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. आजवर भाजपाच्या खांद्यावर शिवसेना निवडणूक लढत आली आहे. यावेळीही भाजपने युती धर्म पाळल्यास सेनेला लोकसभेत ताकद मिळेल. दुसरीकडे या मतदारसंघात मोडणाऱ्या विधासभेच्या सहापैकी पाच जागेवर भाजप आणि एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. गत वर्षी काटोल विधानसभेत भाजपाकडून जिंकलेले आशीष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या काटोलचा कौल लोकसभेत कुणाला जातो याकडे लक्ष लागले आहे.गत पाच वर्षात स्थानिक निवडणुकांमध्येही काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला नाही. दिल्लीत ‘हेवीवेट’ मानले जाणारे मुकुल वासनिक पुन्हा एकदा काँग्रेसकडून येथे दंड थोपटणार आहेत. अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी रामटेकसाठी जिल्हा काँग्रेसकडे अर्ज सादर करून उमेदवारीवर दावा केला होता.यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आल्याचे चित्र समोर आले होते. मात्र वासनिक यांचे नाव पक्के झाल्याने हा वाद शमला आहे. जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी रामटेक विधानसभेतून लढण्याची तयारी चालविली असल्यामुळे पक्षाला आघाडी मिळवून देण्यात त्यांची व विधानसभेच्या इतर इच्छुक उमेदवारांचीही खºया अर्थाने परीक्षा होणार आहे. आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने काँग्रेसच्या सोबत राहील असे दिसते. कारण या मतदार संघात मोडणाºया काटोल विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून जनसंपर्काचे भांडवल तर काँग्रेसकडून विकास खेचण्यासाठी दिल्लीतील वजन या मुद्यांवर प्रचारयुद्ध रंगताना दिसेल.सध्याची परिस्थितीपुढे विधानसभेच्या निवडणुकीची लढाई असल्यामुळे युती व आघाडी धर्म दोन्ही बाजुने तेवढ्याच ताकदीने पाळला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लोकसभेत सेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल. गेल्यावेळी बसपाच्या किरण पाटणकर यांनी ९५, ०५१ मते घेतली होती. बसपाचा यावेळचा उमेदवार कोण असेल याबाबतही उत्सुकता आहे. बसपाच्या उमेदवार दमदार असल्यास याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसेल.सध्या मात्र तसे चित्र नाही.‘आप’च्या अंजली दमानियाने गेल्यावेळी विदर्भात राजकीय माहोल तापविला होता. रामटेकमध्येही ‘आप’चे प्रताप गोस्वामीने २५ हजारावर मते घेतली होती. मात्र यानंतर ‘आप’ने या मतदारसंघात फारसा प्रताप दाखविला नाही.मागील निवडणुकीत या मतदार संघात मतदार संख्या १७ लाख ३१ हजार ४६२ होती. यावेळी १ लाख ६६ हजार १३८ मतदारांची भर पडली आहे. दीड लाखावरील हे नवे मतदार नेमकी काय भूमिका घेतात, यावरही मतदारसंघाचा राजरंग ठरणार आहे.रामटेक लोकसभा मतदारएकूण मतदार- 18,97,600पुरुष- ०9,85,539महिला- 09,12,061२०१४ मध्ये मिळालेली मतेकृपाल तुमाने (शिवसेना)- 5,19,892मुकुल वासनिक (काँग्रेस)- 3,44,101किरण पाटणकर (बसपा)- 95,051प्रताप गोस्वामी (आम आदमी पार्टी)- 25,889गौतम वासनिक (अपक्ष )- 6,353

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKrupal Tumaneकृपाल तुमानेShiv Senaशिवसेना