शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Article 370: “जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, पण...”: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 15:14 IST

Article 370: शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावर भाष्य केले असून, जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचे कलम ३७० वर भाष्यजम्मू-काश्मीरच्या जनतेचे नुकसान होत असल्याचा दावाशेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे लागले याचा विचारही केला नव्हता - टिकैत

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला जम्मू-काश्मीरमधील १४ पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्वपक्षीय बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यानंतर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यानंतर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावर भाष्य केले असून, जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, असे म्हटले आहे. (rakesh tikait statement over farmers protest and jammu and kashmir article 370)

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे मोठी गोष्ट होती. आता तेथील समस्या संपुष्टात येतील, असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे स्थानिक नागरिकांचे नुकसान होत आहे, असा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

“जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल ही अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल”: ओमर अब्दुल्ला

आता पॅकेजही मिळत नाही

आम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेसोबत आहोत. अनुच्छेद ३७० हटवणे ही चांगली बाब असली, तरी त्यामुळे आता स्थानिकांना पॅकेज मिळणे बंद झाले आहे. वीज, वाहतूक यांवर मिळत असलेले अनुदान बंद झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या स्थानिकांना पूर्वीप्रमाणे पॅकेजस, अनुदान सुरू राहिली पाहिजेत, अशी मागणी करत जनतेचे नुकसान होता कामा नये, असे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. 

“जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका लढवणार नाही”

याचा कधीही विचारच केला नव्हता

स्वतंत्र भारत देशात कधी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे लागेल, याचा विचारही केला नव्हता. शेतकरी आणि सरकारमधील चर्चा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी पत्रही पाठवले होते. मात्र, काही झाले, तरी कायदा मागे घेतला जाणार नाही. अन्य मुद्द्यांसाठी चर्चेला यावे, असे उत्तर मिळाले. केंद्रीय कृषी कायद्यावर ठोस उपाय निघेल, असे आताच्या घडीला तरी वाटत नाही, असे राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

नरेंद्र मोदी PM आहेत, BJP नेतेही; जमीन घोटाळा झालाच कसा? अयोध्येतील साधुंचा सवाल

दरम्यान, गतवर्षीच्या २६ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी केला.  

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरrakesh tikaitराकेश टिकैतPoliticsराजकारण