शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Rakesh Tikait: “महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय; सामान्य जनता, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 14:42 IST

Rakesh Tikait: भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली असून, महागाईवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून इंधनदरवाढ, गॅसच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता अगदी त्रस्त झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच इंधनचे दर कमी होण्याची शक्यताही धूसरच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली असून, महागाईवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे. (rakesh tikait criticised modi govt over inflation in nation) 

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. केंद्रीय कृषी कायद्यात दुरुस्ती सूचवा, त्या करू. मात्र, कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही, यावर केंद्र सरकारवर ठाम आहे. याउलट काही झाले, तरी कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, तरी यावर ठोस तोडगा निघालेला नाही. यानंतर आता राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. 

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतेय

सामान्य जनतेचे नुकसान होतेय, शेतकरीही बर्बाद होतोय. सर्व गोष्टी महाग होत चालल्या आहेत. महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय. कंपनी सरकार सुरू असल्याची टीका राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. तसेच जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत घरी जाणार नाही, याचा पुनरुच्चारही राकेश टिकैत यांनी केला आहे.  

दरम्यान, गतवर्षीच्या २६ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, असेही राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणInflationमहागाईrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारFarmers Protestशेतकरी आंदोलन