शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Rakesh Tikait: “महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय; सामान्य जनता, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 14:42 IST

Rakesh Tikait: भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली असून, महागाईवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून इंधनदरवाढ, गॅसच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता अगदी त्रस्त झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच इंधनचे दर कमी होण्याची शक्यताही धूसरच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली असून, महागाईवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे. (rakesh tikait criticised modi govt over inflation in nation) 

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. केंद्रीय कृषी कायद्यात दुरुस्ती सूचवा, त्या करू. मात्र, कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही, यावर केंद्र सरकारवर ठाम आहे. याउलट काही झाले, तरी कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, तरी यावर ठोस तोडगा निघालेला नाही. यानंतर आता राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. 

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतेय

सामान्य जनतेचे नुकसान होतेय, शेतकरीही बर्बाद होतोय. सर्व गोष्टी महाग होत चालल्या आहेत. महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय. कंपनी सरकार सुरू असल्याची टीका राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. तसेच जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत घरी जाणार नाही, याचा पुनरुच्चारही राकेश टिकैत यांनी केला आहे.  

दरम्यान, गतवर्षीच्या २६ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, असेही राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणInflationमहागाईrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारFarmers Protestशेतकरी आंदोलन