शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक खुलासा; “प्रविण दरेकर औषध कंपन्यांच्या माणसांसोबत मला भेटले, तेव्हा...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 12:20 IST

Minister Rajendra Shingane: काही रेमडेसिवीर कंपन्यांनी मे महिन्यात पुरवठा करू असं सांगितलं आहे. जास्तीत जास्त पुरवठा रेमडेसिवीरचा व्हायला हवा यासाठी प्रयत्न सुरु आहे असं त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्याबाबतची सूचना पाळली जात नाही.१२-१३ कंपन्यांनी सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन रेमडेसिवीर महाराष्ट्रात विकाव्या यासाठी एफडीएचा प्रयत्न आहे३-४ कंपन्या वगळता कोणत्याही कंपनीने रिपॉन्स दिला नाही, राजेंद्र शिंगणे यांची माहिती

मुंबई – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा यावर भाष्य केले आहे. राज्याने रेमडेसिवीर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसोबत बोलणं केले. मात्र केवळ ३-४ कंपन्यांनीच राज्याला रिपॉन्स दिला. काही कंपन्यांनी मे महिन्यात इंजेक्शन पुरवठा करू असं सांगितल्याची माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, रेमडेसिवीरचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात राज्यात जाणवतो ही वस्तूस्थिती आहे. पण २१ तारखेनंतर रेमडेसिवीरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू होईल. सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्याबाबतची सूचना पाळली जात नाही. दुर्देवाने खासगी रुग्णालयात सौम्य लक्षणं असली तरी रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही त्याची मागणी होते. काही रेमडेसिवीर कंपन्यांनी मे महिन्यात पुरवठा करू असं सांगितलं आहे. जास्तीत जास्त पुरवठा रेमडेसिवीरचा व्हायला हवा यासाठी प्रयत्न सुरु आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत रेमडेसिवीर कंपन्यांचे उत्पादन वाढत चाललं आहे. किमान एक स्टॉक बाहेर पडायला २०-२२ दिवस लागतील. निर्यातबंदीमुळे १२-१३ कंपन्यांनी सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन रेमडेसिवीर महाराष्ट्रात विकाव्या यासाठी एफडीएचा प्रयत्न आहे. ३-४ कंपन्यांनी रिपॉन्स दिला आणखी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. राज्यातील जनतेसाठी रेमडेसिवीर उपलब्ध होईल असा सरकारचा प्रयत्न आहे असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

दरम्यान, मागील आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मला भेटले. निवेदन दिलं. निर्यातदारांकडे साठा होता तो संकटकाळात राज्याला मिळत असेल या स्वच्छ हेतूने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने त्यांना परवानग्या दिल्या. त्यानंतर कंपन्या त्यांच्याकडील साठा राज्य सरकारलाच देऊ शकत होते इतर कोणालाही देऊ शकत नव्हते. पण मधल्या काळात घडामोडी त्यात झाल्या वेगळं राजकारण यात झालं. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. पण महामारीचा मुकाबला करण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला हवा असं विधान मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.     

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरcorona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस