शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

"सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?", राहुल यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:23 IST

देशाच्या सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन बैठकीत वेळ वाया गेला, असं विधान राहुल यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर केलं होतं.

ठळक मुद्देसंरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून काँग्रेसने केलं होतं 'वॉकआउट'बैठकीत बोलू न दिल्याचा राहुल यांचा आरोपराहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली तक्रार

नवी दिल्लीसंरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून 'वॉक आउट' केलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहिलं आहे. बैठकीत सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचं राहुल यांनी पत्रात नमूद केलं आहे. समितीतील प्रत्येक सदस्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार असायला हवा, असं राहुल यांनी म्हटलं आहे. 

"संरक्षण विषयक संसदीय समितीचा सदस्य असल्यानं एखाद्या विषयावरील चर्चेत मुद्दा उपस्थित करण्याचा मला अधिकार आहे. पण बैठकीत बोलूच न देणं हे लोकशाहीच्या विरोधात असून अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे", असं राहुल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

संरक्षण विषयक संसदीय समितीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी 'वॉक आउट' केले होते. बैठकीत समितीच्या अध्यक्षांनी राहुल यांना बोलूच दिलं नाही. त्यामुळे बैठकीतून निघून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी संतापले; बैठकीतून निघून गेले

देशाच्या सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन बैठकीत वेळ वाया गेला, असं विधान राहुल यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये तिन्ही सेना दलाचे प्रमुख बिपीन रावत सैन्याच्या गणवेशात बदल करण्याबाबतची माहिती देत होते. यावेळी राहुल यांनी हस्तक्षेप करत लडाखमध्ये काय परिस्थिती आहे? चीनविरोधात आपली काय रणनिती आहे? या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी असं म्हटलं. यावरुन बैठकीचे अध्यक्ष जुआल ओराम आणि राहुल यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर राहुल यांनी बैठकीतून निघून जाण्याचा मार्ग स्वीकारला.