शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?", राहुल यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:23 IST

देशाच्या सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन बैठकीत वेळ वाया गेला, असं विधान राहुल यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर केलं होतं.

ठळक मुद्देसंरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून काँग्रेसने केलं होतं 'वॉकआउट'बैठकीत बोलू न दिल्याचा राहुल यांचा आरोपराहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली तक्रार

नवी दिल्लीसंरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून 'वॉक आउट' केलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहिलं आहे. बैठकीत सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचं राहुल यांनी पत्रात नमूद केलं आहे. समितीतील प्रत्येक सदस्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार असायला हवा, असं राहुल यांनी म्हटलं आहे. 

"संरक्षण विषयक संसदीय समितीचा सदस्य असल्यानं एखाद्या विषयावरील चर्चेत मुद्दा उपस्थित करण्याचा मला अधिकार आहे. पण बैठकीत बोलूच न देणं हे लोकशाहीच्या विरोधात असून अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे", असं राहुल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

संरक्षण विषयक संसदीय समितीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी 'वॉक आउट' केले होते. बैठकीत समितीच्या अध्यक्षांनी राहुल यांना बोलूच दिलं नाही. त्यामुळे बैठकीतून निघून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी संतापले; बैठकीतून निघून गेले

देशाच्या सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन बैठकीत वेळ वाया गेला, असं विधान राहुल यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये तिन्ही सेना दलाचे प्रमुख बिपीन रावत सैन्याच्या गणवेशात बदल करण्याबाबतची माहिती देत होते. यावेळी राहुल यांनी हस्तक्षेप करत लडाखमध्ये काय परिस्थिती आहे? चीनविरोधात आपली काय रणनिती आहे? या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी असं म्हटलं. यावरुन बैठकीचे अध्यक्ष जुआल ओराम आणि राहुल यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर राहुल यांनी बैठकीतून निघून जाण्याचा मार्ग स्वीकारला.