शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रियंका गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया यांना करावा लागेल कठोर आव्हानांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 06:11 IST

प्रियंका गांधी-वाड्रा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. लोकसभा निवडणुकीआधी त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारीही सोपवण्यात आली. तर ज्योतिरादित्य पश्चिम उत्तरप्रदेशची आघाडी सांभाळणार आहेत; परंतु या दोघांसाठीही पुढची वाटचाल वाटते तितकी सोपी असणार नाही. अनेक कठोर आव्हानांचा त्यांना सामना करावा लागणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका सध्या अमेरिकेत आहेत. जवळच्या व्यक्तीच्या आरोग्य तपासण्यांसाठी कुटुंबातील सदस्यांसह त्या तीन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेला गेल्या आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परतल्यावर त्या दिलेल्या जबाबदारीवर काम सुरु करतील.उत्तर प्रदेशच्या आघाडीवर त्यांचा प्रवास तितका सोपा-सरळ नसेल. त्यांना असे ३३ लोकसभा मतदारसंघ सोपवले आहे जिथे २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. राहुल गांधी यांनी अत्यंत विचारपूर्वकपणे ही राजकीय चाल खेळली आहे.प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना एकेका मतासाठी झगडावे लागणार आहे. आता काँग्रेसने सर्व लक्ष बाराबांकी (दुसरे स्थान), कुशीनगर (दुसरे), मिर्झापूर (तिसरे), प्रतापगढ (तिसरे) आणि वाराणसी (तिसरे) या मतदारसंघावर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. वाराणसीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी मिळून भाजपाचे बंडखोर शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरु आहेत.तसेच सहारणपूर, गाझियाबाद (राज बब्बर यांनी लढवलेली), लखनौ (रितू बहुगुणा जोशी ज्या पराभवानंतर भाजपावासी झाल्या), कानपूर (श्रीप्रकाश जयस्वाल) आणि खेरी या मतदारसंघावर लक्ष देणार आहे जिथे काँग्रेस दुसऱ्या स्थानी होती. येथेही प्रियंका व ज्योतिरादित्य या दोघांना प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९