शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्ला, भाजपा खासदारांना दिला खास सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 13:34 IST

Narendra Modi News: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून फोन टॅपिंग प्रकरणावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे.

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी सोमवारपासून सुरू झाले आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून फोन टॅपिंग प्रकरणावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाच्या खासदारांना महत्त्वपूर्ण सल्लाही दिला. काँग्रेसकडून पसरवण्यात येत असलेल्या असत्याला सत्याने हरवा, असा सल्ला त्यांनी दिला. (Prime Minister Narendra Modi attack on the Congress & opposition, gave special advice to BJP MPs)

मोदी म्हणाले की, आधी साथीचे आजार यायचे तेव्हा लोक आजारपणामुळे कमी आणि भूकेने अधिक मरायचे. मात्र आम्ही कुणालाही उपाशी राहू दिले नाही. देशातील ८० कोटी लोकांना सातत्याने धान्य पुरवले. यावेळी भाजपाच्या खासदारांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, सत्त म्हणजेच सरकारच्या कामाला जनतेपर्यंत पोहोचवा. सत्य जनतेपर्यंत पोहोचवणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. कोरोना विषाणूमुळे आलेले संकट हे आमच्यासाठी राजकारण नाही तर मानवतेचा विषय आहे.

तुम्ही देशातील नागरिकांना तुम्ही कोरोनाविरोधात भारत कसा लढला आणि जगात काय परिस्थिती होती, याबाबत तुलना करून माहिती द्या. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, संसदेमध्ये अधिकाधिक वेळ उपस्थित राहा, अशी सूचनाही पंतप्रधान मोदींनी यावेळी खासदारांना दिली. या बैठकीत पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेस सर्व ठिकाणी संपत चालली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेस सर्व ठिकाणी संपुष्टात येत आहे. मात्र त्यांना त्यांची चिंता नाही आहे. तर ते आमची चिंता करत आहे. केरळ, बंगाल आणि आसाममध्ये पराभूत झाल्यानंतरही त्यांची झोप गेलेली नाही, असे मोदी पुढे म्हणाले.

दिल्लीमध्ये २० टक्के फ्रंटलाईन वर्कर्स अद्याप व्हॅक्सिनेटेड झालेले नाहीत, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली. तसेच देशामध्ये कोरोनाच्या लसीचा तुटवडा नाही आहे. मात्र लसीबाबत नकारात्मक वातावरणनिर्मिती कऱण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.