शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

'हिंमत असेल प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:41 IST

अशोक चव्हाण यांचे भाजपला आव्हान

मुंबई : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. भाजप एकीकडे देशभक्तीचे नारे देतआहे; तर दुसरीकडे करकरेंचा अवमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देऊन अतिरेक्यांचे संरक्षण करत आहे. हिंमत असेल तर भाजपने आधी प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले.दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी आज प्रचारसभा घेतल्या. प्रज्ञासिंह ठाकूरला वाचविण्याचे काम भाजप सरकारने केले. सरकारी वकिलानेच सरकारचा दबाव असल्याचे सांगितले. भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. देशाची चावी कोणाच्या हाती द्यायची आहे यासाठी ही निवडणूक आहे. खरा चौकीदार कोण हे पाहून मत करा. २०१४ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे सत्ता आली नाही. या वेळी आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत, असेही चव्हाण म्हणाले.सेना-भाजपने मुंबई लुटलीधारावीचा डास आणि मला चावणारा डास एकच म्हणून रक्ताचं नातं म्हणणाºया उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे, असा सवाल करतानाच गुडनाइटचे बटन दाबून शिवसेना- भाजपला पराभूत करा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. मोदी-फडणवीसांनी पाच वर्षांत काय केले, शिवसेना-भाजपने मुंबई लुटली. या दोघांनी मिळून महाराष्ट्र चुलीत घातला. आता देशात परिवर्तनाची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरAshok Chavanअशोक चव्हाण