शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलाविरोधातील मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना बजावली नोटीस

By प्रविण मरगळे | Updated: November 25, 2020 22:19 IST

MNS Morcha, Police News: मुंबईत होणाऱ्या या धडक मोर्चाला शहरातून मनसे कार्यकर्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचतील

मुंबई – भरमसाठ वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसेचा उद्या राज्यभरात मोर्चा होणार असून मुंबई आणि ठाण्यात मनसे ताकदीनं मोर्चा काढणार आहे, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबईत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा धडकणार आहे, वीजबिलात सरकारने सुरुवातीला सवलत देऊ असं जाहीर केले परंतु त्यानंतर सरकारने घुमजाव केल्याने मनसेनं हा मोर्चा काढला आहे.

मुंबईत होणाऱ्या या धडक मोर्चाला शहरातून मनसे कार्यकर्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचतील, याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमतील त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ शकतं, तसेच याच जवळ परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री हे निवासस्थान असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

तर दुसरीकडे उद्या दुपारी १ वाजता ठाण्यातील मनसेच्या मोर्चाला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली. बुधवारी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आपण काढत असलेल्या मोर्चास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे नोटीसीत म्हटले आले. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी लोकांच्या हितासाठी हा मोर्चा निघणार असल्याचे मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी

आपला मुख्यमंत्री आपले दुर्दैव असून ती आता आपलीच जबाबदारी असल्याचं सांगत मनसेचे संदीप देशपांडे यांनी घणाघात केला होता. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मनेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. पण अजूनही वाढीव वीजबिलाचा मुद्दा ऐरणीवर आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.

तर पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी सर्वच राजकीय पक्षांना समज द्यावी, आंदोलन करून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि मनसेचं नाव न घेता त्यांच्या आंदोलनावर भाष्य केले होते.

टॅग्स :MNSमनसेelectricityवीज