शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

“बिहारच्या जनादेशावर भाजपाचा बलात्कार, त्याची पैदास नितीश कुमार”; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान

By प्रविण मरगळे | Updated: November 16, 2020 16:26 IST

Bihar Election Result, RJD News: बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं, तर आरजेडी काँग्रेस महाआघाडीला ११० जागा मिळाल्या.

ठळक मुद्देनितीश कुमार विश्वासघातातून मुख्यमंत्री बनत असतात. यंदा ते मुख्यमंत्री असूनही नसल्यासारखे आहेत.भाजपाने बिहारच्या जनादेशाचा बलात्कार केला आहे आणि नितीश कुमार त्याची पैदास आहेनिवडणूक आयोगाने आरजेडीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात आरजेडी आणि काँग्रेस महाआघाडीला बहुमतासाठी १२ जागा कमी मिळाल्या तर एनडीएला १२५ जागांनी बहुमत मिळालं, मात्र निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपा आणि नितीश कुमारांनी फेरफार केल्याचा आरोप आरजेडी सातत्याने लावत आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना आरजेडीने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. तर १५ जागांसाठी कायदेशीर लढाई देण्याची तयारीही आरजेडीने केली आहे.

अशातच राष्ट्रीय जनता दलाचे(RJD) बिहार अध्यक्ष जगदानंद सिंह यांनी नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. जगदानंद सिंह म्हणाले की, भाजपाने बिहारच्या जनादेशाचा बलात्कार केला आहे आणि नितीश कुमार त्याची पैदास आहे, नितीश कुमार भाजपाच्या मांडीवर खेळणारे असून यापूर्वीही विश्वासघातातून ते मुख्यमंत्री बनले आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच नितीश कुमार विश्वासघातातून मुख्यमंत्री बनत असतात. यंदा ते मुख्यमंत्री असूनही नसल्यासारखे आहेत. भाजपाच्या मांडीवर खेळणारे, संपूर्ण बिहारची जनता आणि मतदारांसोबत भाजपाने बलात्कार केला आहे. जनादेशची चोरी आहे. त्यातूनच नितीश कुमार यांची पैदास आहे असं जगदानंद सिंह म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं, तर आरजेडी काँग्रेस महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. आरजेडीने अनेक जागांवर मतमोजणी आणि टपाल मतांवर आक्षेप घेतला आहे. मात्र निवडणूक आयोगाने आरजेडीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

नितीश कुमार यांची कसोटी लागणार

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

महाआघाडीत वादाची ठिणगी

महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती असं आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे अशी नाराजी काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा यांनी शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक