शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

“बिहारच्या जनादेशावर भाजपाचा बलात्कार, त्याची पैदास नितीश कुमार”; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान

By प्रविण मरगळे | Updated: November 16, 2020 16:26 IST

Bihar Election Result, RJD News: बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं, तर आरजेडी काँग्रेस महाआघाडीला ११० जागा मिळाल्या.

ठळक मुद्देनितीश कुमार विश्वासघातातून मुख्यमंत्री बनत असतात. यंदा ते मुख्यमंत्री असूनही नसल्यासारखे आहेत.भाजपाने बिहारच्या जनादेशाचा बलात्कार केला आहे आणि नितीश कुमार त्याची पैदास आहेनिवडणूक आयोगाने आरजेडीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात आरजेडी आणि काँग्रेस महाआघाडीला बहुमतासाठी १२ जागा कमी मिळाल्या तर एनडीएला १२५ जागांनी बहुमत मिळालं, मात्र निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपा आणि नितीश कुमारांनी फेरफार केल्याचा आरोप आरजेडी सातत्याने लावत आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना आरजेडीने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. तर १५ जागांसाठी कायदेशीर लढाई देण्याची तयारीही आरजेडीने केली आहे.

अशातच राष्ट्रीय जनता दलाचे(RJD) बिहार अध्यक्ष जगदानंद सिंह यांनी नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. जगदानंद सिंह म्हणाले की, भाजपाने बिहारच्या जनादेशाचा बलात्कार केला आहे आणि नितीश कुमार त्याची पैदास आहे, नितीश कुमार भाजपाच्या मांडीवर खेळणारे असून यापूर्वीही विश्वासघातातून ते मुख्यमंत्री बनले आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच नितीश कुमार विश्वासघातातून मुख्यमंत्री बनत असतात. यंदा ते मुख्यमंत्री असूनही नसल्यासारखे आहेत. भाजपाच्या मांडीवर खेळणारे, संपूर्ण बिहारची जनता आणि मतदारांसोबत भाजपाने बलात्कार केला आहे. जनादेशची चोरी आहे. त्यातूनच नितीश कुमार यांची पैदास आहे असं जगदानंद सिंह म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं, तर आरजेडी काँग्रेस महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. आरजेडीने अनेक जागांवर मतमोजणी आणि टपाल मतांवर आक्षेप घेतला आहे. मात्र निवडणूक आयोगाने आरजेडीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

नितीश कुमार यांची कसोटी लागणार

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

महाआघाडीत वादाची ठिणगी

महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती असं आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे अशी नाराजी काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा यांनी शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक