शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

प्रादेशिक पक्षांमधील लढाईमध्ये तामिळनाडूत राष्ट्रीय पक्षांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 03:45 IST

तामिळनाडूतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणे ३९ जागांवर एकाच टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होत आहे.

- असिफ कुरणेचेन्नई : तामिळनाडूतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणे ३९ जागांवर एकाच टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होत आहे. एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक. या दोन प्रमुख द्रविडी नेत्यांच्या अनुपस्थितीत काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांना या राज्यात शिरकाव करण्याची संधी आहे. काँग्रेस राज्यात द्रमुकशी आघाडी करून ९ जागांवर लढत आहे. भाजपने अण्णा द्रमुकशी युती केली असून, भाजप ५ जागा लढवत आहे. सर्वच ठिकाणी पंचरंगी सामने असले तरी खरी लढत द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक अशीच आहे.जयललिता यांच्या अण्णा द्रमुकने २०१४ च्या निवडणुकीत देशात नरेंद्र मोदी लाट असतानाही ३९ पैकी ३७ जागा जिंकून तामिळनाडूत आपलेच राज्य असल्याचे सिद्ध केले होते. त्याआधी २००९ च्या निवडणुकीत द्रमुकने २७ जागा पटकावल्या होत्या. त्यामुळे तामिळी मतदारांना या निवडणुकीत जयललिता व करुणानिधी यांची कमतरता जाणवत आहे. त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते प्रयत्न करत आहेत.जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये सत्तेसाठी अनेकदा उलथापालथ झाली. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला (ज्या सध्या तुरुंगात आहेत) यांचा पुतण्या टीटीव्ही दिनकरन यांनी बंड केले. त्यांच्यासोबत १८ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या जागांवरही आता मतदान होत आहे. या निवडणुकीत दिनकरन हा फॅक्टर किती महत्त्वाचा आहे, हेही स्पष्ट होणार आहे. अभिनेते कमल हासन यांचा पक्षही निवडणुकीच्या राजकारणात उतरला आहे आणि येणार, येणार अशी चर्चा असलेल्या रजनीकांत यांनी मात्र तूर्त गप्प बसण्याचे ठरवले आहे.जयललिता यांच्या पश्चात त्यांची जागा घेणारे नेतृत्व अण्णा द्रमुककडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप त्याचा फायदा घेत, आपले व पक्षाचे वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप फक्त पाच जागा लढवत असले तरी त्यांचा डोळा अण्णा द्रमुकच्या मतदार व केडरवर आहे. द्रमुकची सारी जबाबदारी करुणानिधींचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्याकडेच आहे. त्यांना २०१४ मध्ये मिळालेला भोपळा ( शून्य जागा ) काँग्रेसच्या साथीने फोडायचा आहे. अर्थात २0१६ सालच्या विधानसभा निवडणुकांत द्रमुकने ८८ जागा जिंकून दाखवल्या होत्याच.>मोदी, राहुलची रणनीतीउत्तरेकडील राज्यांत फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊ न एनडीएला अधिकाधिक जागा मिळवण्याचे प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत आहेत, तर केरळ, कर्नाटकाप्रमाणे तामिळनाडुमध्येही आपला दबदबा निर्माण करण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. त्यांनी द्रमुक नेत्यांशी उत्तम संबंध ठेवून आपले महत्त्व कायम ठेवले आहे. अर्थात द्रमुक व काँग्रेसची मैत्री जुनीच आहे.>कोणाचे किती जागांवर उमेदवार(एनडीए आघाडी )अण्णाद्रमुक - २०भाजप- ५पीएमके - ७डीएमडीके - ४तामिल मनिला काँग्रेस - १पीएनके - १पुत्तीया तामिळगम - १>युपीए आघाडीद्रमुक - २०काँग्रेस - ९माकप - २भाकप -२व्हीसीके -२आयजेके - १केएमडीके- १आययूएमएल-१एमडीएमके -१>एएमएमके आघाडी - ३७ ( टी.टी. व्ही दिनकरन यांचा पक्ष)मक्कल निधी मय्यम - ३७ (कमल हसन यांचा पक्ष ) आरपीआय - १नाम तामिळारकच्ची - ३८

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Tamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019