शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

राणेंनी संभाजीराजेंचा आदर्श घेतला पाहिजे, विनायक राऊतांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 18:02 IST

Politics Ratnagiri : मराठा आरक्षणासाठी एकीकडे भाजपचे खासदार संभाजीराजे नवे आंदोलन उभं करत आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांनी संभाजीराजेंवरच संशय व्यक्त करत टीका केली होती. पण, 'छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे' असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला आहे.

ठळक मुद्दे' नारायण राणेंनी संभाजीराजेंचा आदर्श घेतला पाहिजे'शिवसेनेच्या विनायक राऊतांचा टोला

रत्नागिरी : मराठा आरक्षणासाठी एकीकडे भाजपचे खासदार संभाजीराजे नवे आंदोलन उभं करत आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांनी संभाजीराजेंवरच संशय व्यक्त करत टीका केली होती. पण, 'छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे' असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला आहे.रत्नागिरी येथील लांजा इथं पत्रकारांशी बोलत असताना विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीकेचा चांगलाच समाचार घेतला.खासदार विनायक राऊत म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे हे मोठं व्यक्तिमत्त्व आहे, ते आदरणीय असे व्यक्तिमत्व आहेत.मात्र संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना कधी होऊ शकत नाही. संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे, असं माझं मत असल्याचा टोला राऊत यांना नारायण राणे यांना लगावला आहे.'नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलत असतो. तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही, त्यामुळे नारायण राणेंनी हे त्यांचा आदर्श घेतलाच पाहिजे', अशी टीकाही राऊत यांनी केली.तसंच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या काही कामधंदा राहिलेला नाही.दिल्लीवाल्यांनी सुद्धा त्यांना बाजूला केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं सध्या एकच काम आहे ठाकरे सरकारवर टीका करणे, बाकी त्यांना काही काम नाही, अशी टीकाही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.मध्यंतरी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे यांच्यावर खोचक अशी टीका केली होती. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्यानं ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा प्रश्न राणे यांनी उपस्थितीत केला होता. राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी इशारा देणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये संभाजीराजेंनी कोणाचंही नाव न घेता इशारा दिला आहे.

'छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे' असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणVinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणेRatnagiriरत्नागिरी