शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

निवडणूक रिंगणात पक्षीय उमेदवारांपेक्षा अपक्षच अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 05:29 IST

कधी पक्षाने तिकीट नाकारल्याचे दु:ख, त्यामुळे दुखावलेला अहंकार तर कधी एखाद्या मोठ्या पक्षाच्या छत्रछायेखाली राजकीय गणित जुळविण्यासाठी आर्थिक लाभ उठवत स्थापन केलेला स्वतंत्र पक्ष.

नवी दिल्ली - कधी पक्षाने तिकीट नाकारल्याचे दु:ख, त्यामुळे दुखावलेला अहंकार तर कधी एखाद्या मोठ्या पक्षाच्या छत्रछायेखाली राजकीय गणित जुळविण्यासाठी आर्थिक लाभ उठवत स्थापन केलेला स्वतंत्र पक्ष... अशी स्थिती निवडणूक जवळ आली की पाहायला मिळते. यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाकडील उपलब्ध माहितीनुसार आकड्यांचेच गणित मांडायचे झाल्यास लोकसभा निवडणुकीत १९९८ पासून एकूण उमेदवारांपैकी चक्क निम्मे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उभे होते.पाहायला गेल्यास निवडणूक लढविणे बरेच खर्चीक असते; शिवाय अनोळखी पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराला आपला नेता म्हणून निवडून देण्यात अनेकदा मतदारांना स्वारस्य नसते. हे माहीत असूनही अशा प्रकारे अपक्ष किंवा वेगळा पक्ष काढून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा आकडा वाढतच आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडील आकडेवारीनुसार, १९९८ मध्ये एका लोकसभा मतदारसंघातील सरासरी उमेदवार ८.७ एवढे होते. ते २०१४ मध्ये १५.२ एवढे वाढले. या वर्षांमध्ये एका मतदारसंघातील सर्वाधिक उमेदवार अनुक्रमे ३४ आणि ४२ एवढे होते. १९९८ पासून दरवर्षी या उमेदवारांमध्ये वाढच होत आहे.उभ्या राहणाऱ्या उमेदवारांपैकी अनेकांसाठी निवडणूक लढविणे म्हणजे स्थानिक लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग असतो. आपण जिंकणार नाही, याची जाणीव त्यांना असते. पण स्वत:चा अधिकाधिक प्रचार करणे किंवा काहीही करून मिळेल त्या मार्गाने आपला प्रभाव पाडणे हेच त्यांचे ध्येय असते. काही प्रकरणांमध्ये पुढे याच उमेदवारांनी मोठ्या पक्षांसोबत हातमिळवणी केलेली पाहायला मिळते. मतांची खेळी करणे किंबहुना मते फोडण्यासाठीदेखील या उमेदवारांचा वापर होतो, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.अनेकदा तिकीट नाकारले गेल्यामुळेदेखील बंडखोरी होते. या प्रकरणी कर्नाटकचे उदाहरण बोलके ठरेल. लोकप्रिय कन्नड अभिनेते आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अंबरीश यांच्या पत्नी सुमलता यांनी काँग्रेसविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. मंड्या मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आता तिथे त्यांची लढत थेट मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांच्याशी असेल.प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सुमलता इच्छुक होत्या. परंतु वाटाघाटीत हा मतदारसंघ काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाला सोडला. त्यामुळे संतापलेल्या सुमलता यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांचे दिवंगत पती अंबरीश चित्रपट अभिनेते होते. त्यांचीही रूपेरी पडद्यावरील प्रतिमा बंडखोर नायक अशीच होती. आता त्यांच्या पत्नीने बंडाची ‘परंपरा’ कायम ठेवली आहे. काही पक्ष तर निवडणुकीच्या तोंडावर उदयाला आलेले पाहायला मिळतात. तर काही मतांचे विभाजन करण्यासाठी बड्या पक्षांनी जन्माला घातलेले असतात. (वृत्तसंस्था)...म्हणूनच वाढते संख्यातिकीट न मिळाल्याने पक्षातून बाहेर पडून नव्या पक्षाच्या रूपात स्वतंत्र चूल मांडली जाते. अनेकदा मते फोडण्यासाठी अपक्षांना भाव येतो. साहजिकच पक्षातून उभ्या राहणाºया उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारच अधिक होतात आणि निवडणूक लढवणाºया उमेदवारांची संख्या वाढते. या प्रकरणी २०१४ चे उदाहरण बोलके आहे. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या १० महत्त्वाच्या राज्यांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार उभे होते....म्हणूनच वाढते संख्यातिकीट न मिळाल्याने पक्षातून बाहेर पडून नव्या पक्षाच्या रूपात स्वतंत्र चूल मांडली जाते. अनेकदा मते फोडण्यासाठी अपक्षांना भाव येतो. साहजिकच पक्षातून उभ्या राहणाºया उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारच अधिक होतात आणि निवडणूक लढवणाºया उमेदवारांची संख्या वाढते. या प्रकरणी २०१४ चे उदाहरण बोलके आहे. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या १० महत्त्वाच्या राज्यांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार उभे होते.निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या पक्षांची संख्या २०१४ मध्ये १,७०९ एवढी होती ती १० मार्च २०१९ पर्यंत २,३५४ एवढी वाढली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामागे केवळ तीन ते चार उमेदवारच प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असल्याचे मतही राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण