शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या बाबुगिरीमुळे मंत्रीच झाले त्रस्त, रडकुंडीला येऊन म्हणाले आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 21:15 IST

सरकारी अधिकारी वर्गाच्या अडेलतट्टूपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना तुमच्या ऐकिवात असतील. कधीकधी या बाबुगिरीचा मनस्ताप मंत्र्यांनाही सहन करावा लागतो

पाटणा - सरकारी अधिकारी वर्गाच्या अडेलतट्टूपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना तुमच्या ऐकिवात असतील. कधीकधी या बाबुगिरीचा मनस्ताप मंत्र्यांनाही सहन करावा लागतो, असाच एक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील समाज कल्याणमंत्री मदन सहनी यांनी अधिकाऱ्यांच्या बाबुगिरीला वैतागून राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यांनी विभागातील अप्पर मुख्य सचिव अतुल प्रसाद यांच्यावर मनमानी कारभार केल्याचा आरोप केला आहे. 

त्यांनी सांगितले की, विभागामध्ये मंत्र्यांचे कुणीही ऐकत नाही. सर्व नियम कायद्यांच्या चिंधड्या उडवल्या जातात. समाजकल्याण विभागामध्ये अनेक वर्षांपासून अनेक अधिकारी ठाण मांडून आहेत. आणि मनमानी कारभार करत आहेत. त्यांना हटवण्याचा विषय काढला तेव्हा अप्पर मुख्य सचिवांनी ऐकण्यास नकार दिला. मंत्री पुढे म्हणाले की, ही केवळ माझीच परिस्थिती नाही आहे तर बिहारमध्ये कुठल्याही मंत्र्याचे कुठला अधिकारी ऐकत नाही. जून महिन्यामध्ये एकाच ठिकाणी तीन महिने पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही त्या सर्व अधिकाऱ्यांची यादी अप्पर मुख्य सचिवांना दाखवली. मात्र तिच्याकडे लक्ष घालणारा कुणीही नाही आहे. 

दरम्यान, समाजकल्याण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाषा करताना मी मागास जातीमधील असल्याने आम्हाला दबावात ठेवले जात आहे. आमचे म्हणणे कुणी ऐकत नाही, असा आरोप केला. जर मंत्र्याचेच कुणी ऐकत नसेल तर अशा परिस्थितीत मंत्री बनून राहण्याचा काय फायदा, याआधीही मला असेच गप्प करण्यात आले. पण ऐकणारा कुणी नाही. सहन करण्याचीही एक मर्यादा असते. आता राजीनाम्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही, अशा शब्दात मदन सहानी यांनी निराशा व्यक्त केली.

बिहारमध्ये विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मदन सहानी यांच्यापूर्वी भाजपाचे नेते ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनीही आपल्या सरकारवर आरोप केले होते. अनेक असे लोक आहेत. जे पैसे घेऊन बदल्या करतात. त्याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.  

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहार