शहरं
Join us  
Trending Stories
1
एकजूटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
2
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
3
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
4
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
5
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
6
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
7
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
8
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
9
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
10
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
11
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
12
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
13
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
14
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
15
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
16
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
17
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
18
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
19
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
20
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!

काँग्रेसच्या बैठकीमध्ये गोंधळ, मतभेद उफाळून नेत्यांमध्ये झाली हमरीतुमरी

By बाळकृष्ण परब | Updated: January 12, 2021 17:25 IST

Corngress News : बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत माजी मंत्री संजीव टोनी यांनी गोंधळ घातलामाजी आमदार लाल बाबू लाल यांनी माजी प्रभारी शक्ती सिंह गोहील यांच्या कामाची प्रशंसा सुरू केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संजीव प्रसाद टोनी यांनी आपल्या जागेवर उभे राहत मोठ्याने बोलण्यास सुरुवात केलीबोलण्याची संधी दिल्यावर त्यांनी आपण कनिष्ठ जातीचे असल्याने काँग्रेसमध्ये जाणूनबुजून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. बिहारकाँग्रेसचे प्रभारी भक्तचरण दास हे जबाबदारी स्वीकारल्यानंतर तीन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आले असताना त्यांना पक्षामधील अंतर्कलहाची जाणीव झाली. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत माजी मंत्री संजीव टोनी यांनी गोंधळ घातला.काँग्रेसचे माजी आमदार लाल बाबू लाल यांनी माजी प्रभारी शक्ती सिंह गोहील यांच्या कामाची प्रशंसा सुरू केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संजीव प्रसाद टोनी यांनी आपल्या जागेवर उभे राहत मोठ्याने बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते आपली खुर्ची सोडून गोंधळ घालू लागले.त्यानंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून भक्तचरण दास यांनी त्यांना मंचावर बसवले. मात्र त्यांना बोलण्याची संधी दिल्यावर त्यांनी आपण कनिष्ठ जातीचे असल्याने काँग्रेसमध्ये जाणूनबुजून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला.दरम्यान, ही आरोपबाजी सुरू असताना भक्त चरण दास हे संजीव प्रसाद टोनी यांना अशाप्रकारचे आरोप न करण्याबाबत वारंवार बजावत होते. एकावेळी हा गोंधळ एवढा वाढला की पोलीससुद्धा हॉलमध्ये आले. मात्र भक्त चरण दास यांनी त्यांना परत पाठवले. पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत बैठक संपल्याची घोषणा अचानक करण्यात आली.काँग्रेसच्या या बैठकीत संजीव टोनी आणि शकीलुज्जमा, जनार्दन शर्मा यांच्यासारख्या नेत्यांनी निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याचा आरोप उघडपणे केला. माजी विधान परिषद आमदार लाल बाबू लाल यांनी व्यवस्थेच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा गोंधळ अधिकच वाढला. तसेच त्यानंतरच्या कार्यक्रमात नेते दोन गटांत विभागलेले दिसून आले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणBiharबिहार