शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बैठकीमध्ये गोंधळ, मतभेद उफाळून नेत्यांमध्ये झाली हमरीतुमरी

By बाळकृष्ण परब | Updated: January 12, 2021 17:25 IST

Corngress News : बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत माजी मंत्री संजीव टोनी यांनी गोंधळ घातलामाजी आमदार लाल बाबू लाल यांनी माजी प्रभारी शक्ती सिंह गोहील यांच्या कामाची प्रशंसा सुरू केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संजीव प्रसाद टोनी यांनी आपल्या जागेवर उभे राहत मोठ्याने बोलण्यास सुरुवात केलीबोलण्याची संधी दिल्यावर त्यांनी आपण कनिष्ठ जातीचे असल्याने काँग्रेसमध्ये जाणूनबुजून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. बिहारकाँग्रेसचे प्रभारी भक्तचरण दास हे जबाबदारी स्वीकारल्यानंतर तीन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आले असताना त्यांना पक्षामधील अंतर्कलहाची जाणीव झाली. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत माजी मंत्री संजीव टोनी यांनी गोंधळ घातला.काँग्रेसचे माजी आमदार लाल बाबू लाल यांनी माजी प्रभारी शक्ती सिंह गोहील यांच्या कामाची प्रशंसा सुरू केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संजीव प्रसाद टोनी यांनी आपल्या जागेवर उभे राहत मोठ्याने बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते आपली खुर्ची सोडून गोंधळ घालू लागले.त्यानंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून भक्तचरण दास यांनी त्यांना मंचावर बसवले. मात्र त्यांना बोलण्याची संधी दिल्यावर त्यांनी आपण कनिष्ठ जातीचे असल्याने काँग्रेसमध्ये जाणूनबुजून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला.दरम्यान, ही आरोपबाजी सुरू असताना भक्त चरण दास हे संजीव प्रसाद टोनी यांना अशाप्रकारचे आरोप न करण्याबाबत वारंवार बजावत होते. एकावेळी हा गोंधळ एवढा वाढला की पोलीससुद्धा हॉलमध्ये आले. मात्र भक्त चरण दास यांनी त्यांना परत पाठवले. पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत बैठक संपल्याची घोषणा अचानक करण्यात आली.काँग्रेसच्या या बैठकीत संजीव टोनी आणि शकीलुज्जमा, जनार्दन शर्मा यांच्यासारख्या नेत्यांनी निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याचा आरोप उघडपणे केला. माजी विधान परिषद आमदार लाल बाबू लाल यांनी व्यवस्थेच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा गोंधळ अधिकच वाढला. तसेच त्यानंतरच्या कार्यक्रमात नेते दोन गटांत विभागलेले दिसून आले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणBiharबिहार