शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

‘राज’दरबारी प्रश्न निकाली! राज ठाकरेंचा एकच फोन अन् टोलमाफ, मावळवासियांनी मानले आभार

By प्रविण मरगळे | Updated: February 22, 2021 13:36 IST

MNS Raj Thackeray News: हे टोलनाके बंद करावेत यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(CM Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचीही भेट घेतली होती

ठळक मुद्देराज ठाकरेंच्या भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली लागला आहेकृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, निर्णय झटपट लागतात मावळवासियांच्या शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरेंची आभार भेट

मुंबई – काही दिवसांपूर्वी पुण्यातील सोमाटणे टोल स्थानिकांसाठी बंद करावा ही मागणी घेऊन मावळवासियांनी कृष्णकुंज गाठलं होतं, फक्त दीड किलोमीटर अंतर २ टोलनाके असल्याने स्थानिकांनी या टोलवसुलीविरोधात मोर्चा उघडला होता, याबाबत मावळवासियांसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते, टोलवसुलीविरोधात नागरिकांकडून तीव्र आंदोलन होणार होते, मात्र तत्पूर्वी या लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती.(Maval Residents Thanks to MNS Raj Thackeray over Toll Exemption from Somatane & Varsoli Naka)  

हे टोलनाके बंद करावेत यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(CM Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचीही भेट घेतली होती परंतु, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली लागला आहे, त्यामुळे या सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रश्न खुद्द राज ठाकरेंनी एकाच फोनवर सोडवल्याने मावळवासियांना आनंद झाला होता, त्यांनी पुण्याचे मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे आणि नेते बाळा नांदगावकर यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले, त्याचसोबत कृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, निर्णय झटपट लागतात असं कौतुकही या शिष्टमंडळातील सदस्य मिलिंद अच्युत यांनी केले.

लोणावळ्यातील वर्सोली आणि सोमटणे-तळेगाव टोल नाक्यांवर मावळवासियांकडून टोल घेण्यात येणार नाही, त्याचा फायदा MH 14 नंबरच्या गाड्या असलेल्यांना होणार आहे. मागील भेटीवेळी या सर्वपक्षीय नेत्यांनी राज ठाकरेंकडे आपलं गाऱ्हाणं मांडले होते, त्यानंतर भेटीतच राज ठाकरेंनी IRB चे अधिकारी विरेंद्र म्हैसकर यांना फोन लावत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली, म्हैसकर यांनी समस्या लवकरात लवकर सोडवतो असं राज ठाकरेंना सांगितले,  त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो असं आश्वासन राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला दिलं होतं, त्यानंतर काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला.

कोरोनाकाळात अनेक नागरिकांनी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरेंकडे स्वत:च्या समस्या मांडल्या होत्या, यात कोळीबांधव, डबेवाले, वारकरी संप्रदाय, पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ, डॉक्टर्स, बँड-बँन्जो असोसिएशन अशा विविध क्षेत्रातील लोकांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती, राज ठाकरेही अनेकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ मार्गी लावत होते, त्यामुळे या कालावधीत समस्या मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून कृष्णकुंजकडून लोकांनी अपेक्षा ठेवल्या होत्या.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेtollplazaटोलनाका