शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

ममतांचे टेंन्शन अजून वाढले, आणखी एका निकटवर्तीयाने नव्या पक्षाची घोषणा करत विरोधात रणशिंग फुंकले

By बाळकृष्ण परब | Updated: January 21, 2021 21:13 IST

west bengal assembly election 2021: सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांनी एकापाठोपाठ एक अशी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममतांच्या अजून एका निकटवर्तीयांने नव्या पक्षाची घोषणा करत ममतांविरोधात रणशिंग फुंकले आहे.

ठळक मुद्देबंगालमधील मुस्लिम समुदायावर बऱ्यापैकी प्रभाव असलेले फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आज आपल्या नव्या पक्षाची केली घोषणा सिद्दीकी यांनी आपल्या पक्षाचे नाव इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) असे ठेवले आहेपीरजादा अब्बास सिद्दीकी हे दीर्घकाळापासून ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय राहिले होते

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची चिंता अधिकाधिक वाढत आहे. आधी सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांनी एकापाठोपाठ एक अशी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममतांच्या अजून एका निकटवर्तीयांने नव्या पक्षाची घोषणा करत ममतांविरोधात रणशिंग फुंकले आहे.ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय आणि बंगालमधील मुस्लिम समुदायावर बऱ्यापैकी प्रभाव असलेले फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. सिद्दीकी यांनी आपल्या पक्षाचे नाव इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) असे ठेवले आहे. पीरजादा अब्बास सिद्दीकी हे दीर्घकाळापासून ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय राहिले होते. मात्र गेल्या काही काळापासून ते ममतांवर नाराज होते. तसेच उघडपणे तृणमूल काँग्रेसला विरोध करत होते.पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी हल्लीच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर ओवेसी यांनी अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष निवडणूक लढवेल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर अब्बास सिद्दीकी यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची तयारी सुरू केली आणि आज नव्या पक्षाची घोषणा केली.नव्या पक्षाची घोषणा करताना सिद्दीकी म्हणाले की, आमचा पक्ष हा भारतातील पहिला खरा धर्मनिरपेक्ष पक्ष असेल. तो वंचित वर्गातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करेल. स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्षतेचा दावा करणारे अनेक पक्ष अस्तित्वात आले. मात्र एका वर्गाचा अपवाद वगळता अन्य लोक वंचित राहिले. मुस्लिम आणि मागासवर्गीय मागे पडले आहेत. आमचा उद्देश वंचित वर्गातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे, असे त्यांनी सांगितले.अब्बास सिद्दीकी यांनी या नव्या पक्षाचे अध्यक्षपद त्यांचे भाऊ नौशाद सिद्दीकी यांच्याकडे सोपवले आहे. अब्बास सिद्दीकींच्या या पक्षामुळे ममता आणि तृणमूल काँग्रेसच्या मुस्लिम व्होटबँकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण