शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 14:29 IST

Mamata Banerjee & Narendra Modi News: ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जींमधील वाद कायम राहिला आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांमध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग या जातीचे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठवले मोदींबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेट म्हणून आंबे पाठवले आहेत

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. नुकत्याच आटोपलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका दिसून आली होती. (Mamata Banerjee & Narendra Modi News) ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जींमधील वाद कायम राहिला आहे. मात्र असे असले तरी दोन्ही नेत्यांमधील वैयक्तिक संबंधांमध्ये माधुर्य कायम आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांमध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे. (Mamata Banerjee sent Malda Mango to Prime Minister Narendra Modi)

ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग या जातीचे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठवले आहेत. मोदींबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेट म्हणून आंबे पाठवले आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंब्याच्या पेट्या भेट म्हणून पाठवल्या आहेत.

बंगालमधील राजकीय हिंसाचार, नारदा घोटाळ्यातील उघड होत असलेली प्रकरणे, मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांचे अचानक करण्यात आलेले स्थानांतरण आणि राज्यपाल जगदीप घनखड अशा एक ना अनेक विषयांवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सातत्याने तणाव आहे.

दरम्यान, केंद्र सरकारसोबत तणाव असला तरी ममता बॅनर्जी यांनी आंबे पाठवण्याची परंपरा कायम राखली आहे. ममता बॅनर्जी २०११ पासून भेट म्हणून आंबे पाठवत आहेत. २०११ मध्येच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणMangoआंबा