शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चक्क व्यासपीठावरच केस आणि दाढी कापण्यासाठी मंत्र्याने युवकाला दिले ‘इतके’ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 09:25 IST

बुधवारी पुन्हा कॅबिनेट मंत्री विजय शहा गुलाईमाल दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी त्या युवकाला व्यासपीठावर बोलावले, या युवकाचं नाव रोहिदास होते.

ठळक मुद्देआत्मनिर्भर बनण्यासाठी मध्य प्रदेशच्या मंत्र्याने युवकांना केलं आवाहनस्थानिक बाजारात भाजी, कपडे, बांगड्या, चप्पला-बुटे यासारखे छोटे व्यवसाय सुरु करावेतयुवकांना स्वयंरोजगारासाठी सरकार कर्ज म्हणून १० हजार रुपये देणार

भोपाळ – मध्य प्रदेशात वनमंत्री विजय शहा यांनी एका गावात कोविड १९ च्या सुरक्षेचं पालन करत चक्क व्यासपीठावरच एका नाभिकाकडून केस कापले आणि दाढी करुन घेतली. इतकचं नाही तर त्या मंत्र्याने या युवकाला स्वयंरोजगारासाठी ६० हजार रुपये मदत जाहीर केली. मंत्री विजय शहा हे गुलाईमाल गावच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी केलेल्या या प्रकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी विजय शहा हे गुलाईमालच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी युवकांना आत्मनिर्भर बनण्याचं आवाहन केले होते. त्यातील एका युवकाला मंत्र्यांनी व्यासपीठावरुन विचारले तु काय काम करु शकतो? तेव्हा तो युवक म्हणाला मी कटिंग-सेविंग चांगल्यारितीने करु शकतो. मला सलून उघडण्याची इच्छा आहे. त्यावेळी या युवकाला विजय शहा यांनी मदतीचं आश्वासन दिले होते.

बुधवारी पुन्हा कॅबिनेट मंत्री विजय शहा गुलाईमाल दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी त्या युवकाला व्यासपीठावर बोलावले, या युवकाचं नाव रोहिदास होते. व्यासपीठावर त्यांनी युवकाला सांगितले की, माझी कटिंग आणि सेविंग कर, त्यानंतर युवकाने केस कापण्याचे सामान आणले आणि व्यासपीठावर मंत्री विजय शहा यांचे केस आणि दाढी कापली. यानंतर मंत्र्यांने त्याला ५० हजारांचे सलूनसाठी लागणारे सामान, क्रिम, ब्रश फर्निचर इ. साहित्य दिले. त्याचसोबत १० हजार रुपये रोख दिले आणि सांगितले आता, जा आणि आत्मनिर्भर हो, काही अडचण आली तर मला सांग असं युवकाला सांगितले.

याबाबत मंत्री विजय शहा म्हणाले की, कोविड १९ मुळे लोक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. काही महिन्यांपासून अनेकांच  रोजगार गेलेत. लोकांमध्ये विश्वास जागवण्यासाठीच मी सर्वांसमोर युवकाकडून केस आणि दाढी कापून घेतली. आवश्यक उपाययोजना करुन केस कापणे सुरक्षित आहे हे दाखवून दिले. मी या युवकाला मदत केली आणि तो स्वत: आत्मनिर्भर होऊन सलून उघडू शकेल असं ते म्हणाले.

दरम्यान, युवकांनी स्थानिक बाजारात भाजी, कपडे, बांगड्या, चप्पला-बुटे यासारखे छोटे व्यवसाय सुरु केले पाहिजेत. या व्यवसायासाठी सरकार बँकांच्या माध्यमातून युवकांना १० हजार रुपये कर्जही उपलब्ध करुन देईल. युवकांना फक्त कर्जाची मूळ रक्कम परतफेड करायची आहे तर कर्जावरील व्याज सरकार भरेल असंही मंत्री विजय शहा यांनी युवकांना सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या