शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाल निशाण अस्तित्व राखणार की अस्ताला जाणार ? निवडणुकीच्या मैदानावर डाव्यांना शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:33 IST

Kerala Assembly Elections 2021 : कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गाचा आवाज बनून ज्यांनी पश्चिम बंगालसह त्रिपुरा, केरळ या राज्यांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ एकहाती सत्तेचे नाणे खणखणीत वाजवून दाखविले ते डावे पक्ष सध्या देशातील राजकीय पटलावर आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत.

- पोपट पवारतिरुवनंतपुरम - कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गाचा आवाज बनून ज्यांनी पश्चिम बंगालसह त्रिपुरा, केरळ या राज्यांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ एकहाती सत्तेचे नाणे खणखणीत वाजवून दाखविले ते डावे पक्ष सध्या देशातील राजकीय पटलावर आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत.बंगाल आणि त्रिपुरातील एकहाती सत्तेची कमान हातातून निसटल्यानंतर उरल्यासुरल्या केरळच्या मैदानावर लाल निशाण फडकवत ठेवण्यासाठी डाव्या पक्षांनी आपले अस्तित्व पणाला लावले असले तरी कधीकाळी प्रबळ संघटन आणि जनाधाराचे वैभव लाभलेले हे लाल निशाण आपले अस्तित्व राखणार की, देशाच्या राजकीय पटलावरून अस्ताला जाणार याचा फैसलाच केरळच्या मैदानावर होणार आहे.  विशेष म्हणजे केरळमध्ये सत्तेसाठी ज्यांच्याबरोबर टोकाचा संघर्ष सुरू आहे, त्याच काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालमध्ये मात्र गळ्यात गळे घालण्याची वेळ डाव्यांवर आली आहे. पश्चिम बंगालच्या सिंहासनावर साडेतीन दशकांहून अधिक काळ डाव्या पक्षांनी आपली मांड शाबूत ठेवली होती. शेतकरी आणि कामगारांचा तारणहार म्हणून या पक्षाची प्रतिमा तळागाळापर्यंत पोहोचली. मात्र, सिंगूर आणि नंदीग्राममधील भूसंपादनावेळी डाव्यांनी भांडवलदारांची तळी उचलल्याने लाल झेंड्याखाली एकवटलेला वंचित वर्ग तृणमूल काँग्रेसच्या आश्रयाला गेला, परिणामी डाव्यांचा बालेकिल्ला पत्त्यासारखा कोसळला. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांना अवघ्या ३२ जागांवर विजय मिळविता आला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र एकही जागा त्यांच्या पदरात पडली नाही. विधानसभा निवडणुकीत २५ टक्के मते घेतलेल्या डाव्यांना लोकसभा निवडणुकीत १० टक्केही मते घेता आली नाहीत. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही डावे पक्ष काँग्रेसचा हात हातात घेऊन मैदानात उतरले असले तरी सत्तेच्या खिजगणतीतही ते नसल्याचे चित्र आहे. डाव्यांचा हक्काचा मतदार भाजपकडे आकृष्ट झाल्याने तिसऱ्या-चौथ्या क्रमांकासाठी डावे झगडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे त्रिपुरामध्ये माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांनी २५ वर्षे सत्तेचा एकछत्री अंमल ठेवला खरा. मात्र, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्षासह डाव्यांचा हाही गड काबीज केला. केरळमध्ये मात्र आलटून-पालटून सत्तेची कमान हातात ठेवत डाव्यांनी कसेबसे या एकमेव राज्यात अस्तित्व टिकवून ठेवले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही डावे पुरत्या ताकदीनिशी रिंगणात आहेत. काँग्रेसच्या सुंदोपसुंदीचा लाभ उठवीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून ते विक्रम करण्याची तयारी करीत असले तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २० पैकी अवघी एक जागा नावावर असलेले डावे केरळच्या भूमीत आपले लाल निशाण टिकवून ठेवण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. केरळमध्ये दुबार मतदारांची संख्या ३८,५८६  हरिपाड : केरळमधील मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असलेल्यांची संख्या फक्त ३८,५८६ इतकीच असल्याचे उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी आश्चर्य व्यक्त केले. निवडणूक आयोगाने केरळ उच्च न्यायालयात सांगितले की, त्यांनी छाननी केलेल्या ३,१६,६७१ नावांपैकी ३८,५८६ दुबार नावांची ओळख पटली आहे.  राजकीय पक्षांकडून मिळालेल्या माहितीनंतर ही संख्या प्राप्त झाली आहे. 

 चेन्निथला यांनी या आकडेवारीबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. हे अत्यंत धक्कादायक आहे. राज्यभरातील मतदार याद्यांमध्ये अनेक नावे बनावट आहेत.  मी १४० मतदारसंघातील  चार लाख ३४ हजार तक्रारी केल्या होत्या आणि त्यावर मी ठाम आहे.  ही क्षुल्लक गोष्ट नसून, निवडणूक प्रक्रियेचा गळा दाबण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  एकाहून अधिक मतदारसंघात ज्यांची नावे आहेत, अशांची ओळख पटवून त्यांनी केवळ एकाच ठिकाणी मतदान करावे, याबाबत पावले उचलण्याबाबत उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले.चेन्निथला यांच्या अर्जाची सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले.  बनावट आणि दुबार नावे असणाऱ्या मतदारांना मतदानात सहभागी करू नये, अशी तक्रार चेन्निथला यांनी केली होती.

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Politicsराजकारण