शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ जपा, योगा करत जा; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला

By प्रविण मरगळे | Updated: November 13, 2020 11:08 IST

Shiv Sena Neelam Gorhe, Amruta Fadanvis News: "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !! ही दिपावली आपल्या ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो असा टोलाही नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.

ठळक मुद्देअमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला. आपल्याला ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचा अमृता फडणवीसांना टोला

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि शिवसेना यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत आहेत. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रीय असतात, अनेकदा अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर जाहीरपणे टीका करत खिल्ली उडवली आहे, नुकतेच बिहार निवडणुकीच्या निकालावरून देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ पोस्ट करत अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख “शवसेना” असा केला होता. त्यावरून आता शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

याबाबत शिवसेना नेत्या म्हणाल्या की, अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे, अमृता ताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत, शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील "अ" मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मन स्वास्थ चांगले राहते, आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका असा चिमटा त्यांनी काढला आहे.

तसेच आपल्या नावात "अ" च महत्व आहे ते निघाले तर "मृता" राहिल , शिवसेनेची काळजी करू नका, आपले मानसिक स्वास्थ जपा, "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !! आपल्याला ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो असा टोलाही नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कधीच गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे जमले नाही असंही म्हटलं आहे.

"महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी", शिवसेनेला 'शवसेना' म्हणत अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

अमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला. "'शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय? महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद" असं ट्विट केलं होतं, अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले. पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने २२ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व २२ जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. यावरून अमृता फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAmruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNeelam gorheनीलम गो-हे