शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ जपा, योगा करत जा; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला

By प्रविण मरगळे | Updated: November 13, 2020 11:08 IST

Shiv Sena Neelam Gorhe, Amruta Fadanvis News: "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !! ही दिपावली आपल्या ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो असा टोलाही नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.

ठळक मुद्देअमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला. आपल्याला ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचा अमृता फडणवीसांना टोला

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि शिवसेना यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत आहेत. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रीय असतात, अनेकदा अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर जाहीरपणे टीका करत खिल्ली उडवली आहे, नुकतेच बिहार निवडणुकीच्या निकालावरून देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ पोस्ट करत अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख “शवसेना” असा केला होता. त्यावरून आता शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

याबाबत शिवसेना नेत्या म्हणाल्या की, अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे, अमृता ताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत, शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील "अ" मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मन स्वास्थ चांगले राहते, आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका असा चिमटा त्यांनी काढला आहे.

तसेच आपल्या नावात "अ" च महत्व आहे ते निघाले तर "मृता" राहिल , शिवसेनेची काळजी करू नका, आपले मानसिक स्वास्थ जपा, "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !! आपल्याला ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो असा टोलाही नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कधीच गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे जमले नाही असंही म्हटलं आहे.

"महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी", शिवसेनेला 'शवसेना' म्हणत अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

अमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला. "'शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय? महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद" असं ट्विट केलं होतं, अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले. पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने २२ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व २२ जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. यावरून अमृता फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAmruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNeelam gorheनीलम गो-हे