शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

भाऊ-बहिणीच्या वादात आईचं ह्दय तुटलं; YSR रेड्डी कुटुंबात गृहकलह, बहिणीनं शोधला वेगळा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 19:51 IST

जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही.

ठळक मुद्देगुरुवारी वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्याविषयी खूप काही आठवणी ताज्या झाल्याआई पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या मुलीसाठी समर्थन मागत असल्याचं दिसून आलं.आज मला होणारा त्रास पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू वाहत असतील. मी तुमच्यावर खूप प्रेम करते

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांची बहीण शर्मिला यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. बहिण वाय. एस शर्मिलाने भावाच्या पाठिंब्याशिवाय आणि इच्छेविरुद्ध तेलंगनात वायएसआर तेलंगाना पार्टी (YSRTP) पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून दोन्ही भाऊ-बहिणींमध्ये दरी निर्माण झाली आहे. गुरुवारी वाय. एस राजशेखर रेड्डी यांच्या १२ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात याची झलक पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई वाय. एस विजयलक्ष्मी यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यात पक्षातील ३०० जणांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु स्वत:च्या वडिलांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हजर राहिले नाही त्यामुळे लोक हैराण झाले. तर शर्मिला या आईसोबत कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी प्रखरतेने दिसून आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री या सभेत न पोहचल्याने आई खूप दु:खी आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार याआधी मुख्यमंत्री आई विजयम्मा आणि बहिण शर्मिलासोबत आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील इडुपुलापाया येथे वायआयआर घाटावर वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी ४० मिनिटं भाऊ-बहिणीच्या नात्यात दरार असल्याचं स्पष्ट दिसत होते. गुरुवारी वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्याविषयी खूप काही आठवणी ताज्या झाल्या. ही सभा एकप्रकारे पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित वाटत होती असं ज्येष्ठ पत्रकार जे या सभेत उपस्थित होते त्यांनी सांगितले.

या बैठकीत कुणीही बडा नेता उपस्थित झाला नाही परंतु जे कुणी आले ते वायएसआर यांच्या निकटचे आणि सध्या राजकारणात सक्रीय नाहीत ते होते. यात आई पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या मुलीसाठी समर्थन मागत असल्याचं दिसून आलं. यात शर्मिलानं आतापर्यंत तुम्ही माझ्या भावाला समर्थन दिलं आणि मला समर्थन देण्याची वेळ आलीय असं म्हटलं आहे. जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही.

काही दिवसांपूर्वी शर्मिला यांनी केलेल्या ट्विटनेही सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यात शर्मिला म्हणाल्या की, बाबा, आपण सध्या एकाकी पडलोय, अडचणीच्या काळात तुम्ही नेहमी माझ्या पाठिशी उभे राहिलात. अडचणीचा सामना करताना प्रेमात कुठेही तडजोड करू नको असं तुम्ही सांगितलं होतं. आज मला होणारा त्रास पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू वाहत असतील. मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणा