शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भाऊ-बहिणीच्या वादात आईचं ह्दय तुटलं; YSR रेड्डी कुटुंबात गृहकलह, बहिणीनं शोधला वेगळा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 19:51 IST

जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही.

ठळक मुद्देगुरुवारी वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्याविषयी खूप काही आठवणी ताज्या झाल्याआई पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या मुलीसाठी समर्थन मागत असल्याचं दिसून आलं.आज मला होणारा त्रास पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू वाहत असतील. मी तुमच्यावर खूप प्रेम करते

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांची बहीण शर्मिला यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. बहिण वाय. एस शर्मिलाने भावाच्या पाठिंब्याशिवाय आणि इच्छेविरुद्ध तेलंगनात वायएसआर तेलंगाना पार्टी (YSRTP) पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून दोन्ही भाऊ-बहिणींमध्ये दरी निर्माण झाली आहे. गुरुवारी वाय. एस राजशेखर रेड्डी यांच्या १२ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात याची झलक पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई वाय. एस विजयलक्ष्मी यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यात पक्षातील ३०० जणांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु स्वत:च्या वडिलांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हजर राहिले नाही त्यामुळे लोक हैराण झाले. तर शर्मिला या आईसोबत कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी प्रखरतेने दिसून आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री या सभेत न पोहचल्याने आई खूप दु:खी आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार याआधी मुख्यमंत्री आई विजयम्मा आणि बहिण शर्मिलासोबत आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील इडुपुलापाया येथे वायआयआर घाटावर वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी ४० मिनिटं भाऊ-बहिणीच्या नात्यात दरार असल्याचं स्पष्ट दिसत होते. गुरुवारी वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्याविषयी खूप काही आठवणी ताज्या झाल्या. ही सभा एकप्रकारे पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित वाटत होती असं ज्येष्ठ पत्रकार जे या सभेत उपस्थित होते त्यांनी सांगितले.

या बैठकीत कुणीही बडा नेता उपस्थित झाला नाही परंतु जे कुणी आले ते वायएसआर यांच्या निकटचे आणि सध्या राजकारणात सक्रीय नाहीत ते होते. यात आई पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या मुलीसाठी समर्थन मागत असल्याचं दिसून आलं. यात शर्मिलानं आतापर्यंत तुम्ही माझ्या भावाला समर्थन दिलं आणि मला समर्थन देण्याची वेळ आलीय असं म्हटलं आहे. जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही.

काही दिवसांपूर्वी शर्मिला यांनी केलेल्या ट्विटनेही सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यात शर्मिला म्हणाल्या की, बाबा, आपण सध्या एकाकी पडलोय, अडचणीच्या काळात तुम्ही नेहमी माझ्या पाठिशी उभे राहिलात. अडचणीचा सामना करताना प्रेमात कुठेही तडजोड करू नको असं तुम्ही सांगितलं होतं. आज मला होणारा त्रास पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू वाहत असतील. मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणा