शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ-बहिणीच्या वादात आईचं ह्दय तुटलं; YSR रेड्डी कुटुंबात गृहकलह, बहिणीनं शोधला वेगळा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 19:51 IST

जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही.

ठळक मुद्देगुरुवारी वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्याविषयी खूप काही आठवणी ताज्या झाल्याआई पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या मुलीसाठी समर्थन मागत असल्याचं दिसून आलं.आज मला होणारा त्रास पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू वाहत असतील. मी तुमच्यावर खूप प्रेम करते

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांची बहीण शर्मिला यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. बहिण वाय. एस शर्मिलाने भावाच्या पाठिंब्याशिवाय आणि इच्छेविरुद्ध तेलंगनात वायएसआर तेलंगाना पार्टी (YSRTP) पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून दोन्ही भाऊ-बहिणींमध्ये दरी निर्माण झाली आहे. गुरुवारी वाय. एस राजशेखर रेड्डी यांच्या १२ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात याची झलक पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई वाय. एस विजयलक्ष्मी यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यात पक्षातील ३०० जणांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु स्वत:च्या वडिलांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हजर राहिले नाही त्यामुळे लोक हैराण झाले. तर शर्मिला या आईसोबत कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी प्रखरतेने दिसून आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री या सभेत न पोहचल्याने आई खूप दु:खी आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार याआधी मुख्यमंत्री आई विजयम्मा आणि बहिण शर्मिलासोबत आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील इडुपुलापाया येथे वायआयआर घाटावर वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी ४० मिनिटं भाऊ-बहिणीच्या नात्यात दरार असल्याचं स्पष्ट दिसत होते. गुरुवारी वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्याविषयी खूप काही आठवणी ताज्या झाल्या. ही सभा एकप्रकारे पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित वाटत होती असं ज्येष्ठ पत्रकार जे या सभेत उपस्थित होते त्यांनी सांगितले.

या बैठकीत कुणीही बडा नेता उपस्थित झाला नाही परंतु जे कुणी आले ते वायएसआर यांच्या निकटचे आणि सध्या राजकारणात सक्रीय नाहीत ते होते. यात आई पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या मुलीसाठी समर्थन मागत असल्याचं दिसून आलं. यात शर्मिलानं आतापर्यंत तुम्ही माझ्या भावाला समर्थन दिलं आणि मला समर्थन देण्याची वेळ आलीय असं म्हटलं आहे. जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही.

काही दिवसांपूर्वी शर्मिला यांनी केलेल्या ट्विटनेही सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यात शर्मिला म्हणाल्या की, बाबा, आपण सध्या एकाकी पडलोय, अडचणीच्या काळात तुम्ही नेहमी माझ्या पाठिशी उभे राहिलात. अडचणीचा सामना करताना प्रेमात कुठेही तडजोड करू नको असं तुम्ही सांगितलं होतं. आज मला होणारा त्रास पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू वाहत असतील. मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणा