शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

पंतप्रधानांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे - चंद्राबाबूू नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:45 IST

लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव निश्चित असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी पाठविण्याची वेळ जवळ आली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.

अमरावती : लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव निश्चित असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी पाठविण्याची वेळ जवळ आली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.तेलुगू देसमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भाजपाला सत्तेवरून घालविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजुटीने प्रयत्न सुरू केले आहेत. देश वाचवा, लोकशाही वाचवा या घोषणा साऱ्या देशात दुमदुमत आहेत. जनहितविरोधी राजवट मतदारांना नको आहे. भाजपाशी राजकीय शत्रुत्व पत्करणे जसे अपरिहार्य होते, तसेच लोकशाही वाचविण्यासाठी मोदींना कडाडून विरोध करणेही आवश्यक आहे. पाच राज्यांच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपाचा झालेला पराभव पुरेसा बोलका आहे.नायडू म्हणाले की, लोकसभा निवडणुकांत मोदींना हार पत्करावी लागणार असा जनमत चाचण्यांचाही निष्कर्ष आहे. आंध्र प्रदेशच्या हक्काचे १.६ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने अद्यापही दिलेले नाहीत. यासंदर्भात मी पंतप्रधान मोदी यांना पत्रही लिहिले. या राज्याकडे भाजपा जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. आंध्र प्रदेशला न्याय मिळावा यासाठी १५ पक्षांनी संसदेत केंद्र सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू