शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:49 IST

पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे.

बंगळूरू : पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे. अपक्ष लोकप्रतिनिधीच मतदारसंघाची सेवा करू शकतो. अपक्षांची ताकद अजून मतदारांना कळलेली नाही, असे मत प्रख्यात अभिनेते व बंगळुरू (मध्य) मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांनी व्यक्त केले.एका मुलाखतीमध्ये प्रकाश राज यांनी राजकारणाबाबतची आपली भूमिका, राजकीय विचारसरणी, राजकीय पक्षांचा खासदारांवरील प्रभाव या बाबींवर मतप्रदर्शन केले. मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडतात. त्याने त्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची अपेक्षा असते. नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांना ते मत देत नाहीत. कारण ते नेते मतदारसंघातील समस्या सोडवत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.आपल्या उमेदवारीमुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होत आहे का? या प्रश्नावर त्यांनी कोणते पक्ष धर्मनिरपेक्ष व कोणते धार्मिक हे कोण ठरविणार, असा प्रतिसवाल केला. कॉँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवत असली, तरी ते सत्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीनंतर हा भ्रम दूर होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशामध्ये हिंदू दहशतवाद असल्याचेही ते म्हणाले.आधी तुम्ही निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले आणि आता रिंगणात उतरला आहात, असे विचारले असता, प्रकाश राज म्हणाले की, निवडणुकांविषयी सामान्यांची अलिप्तता दूर व्हावी, यासाठीच मी निवडणूक लढवत आहे. त्यासाठी आम्ही चौकसभा, लोकांशी संवाद यावर भर देत आहोत. निवडणुकीचा प्रचार आता संपेलही, पण माझा प्रचार यापुढेही सुरूच राहील.भाजप व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे एखाद्या विश्वस्त संस्थेचे वाटतात, त्यांनी काही ना काही देण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या वेळी दिलेल्या १५ लाखांच्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्नही प्रकाश राज यांनी भाजपचे नाव न घेता केला.>अभिनेतेही नागरिकचकमल हसन, रजनीकांत आणि तुम्हाला राजकारणात प्रवेश करावासा का वाटला, असा प्रश्न करता राज यांनी आम्हीही नागरिक आहोत आणि आम्हालाही राजकारणात येण्याचा हक्क असल्याचे सांगितले. डॉक्टर, वकील राजकारणात येतात, तेव्हा असा प्रश्न उपस्थित होत नाही, मग अभिनेत्यांबाबतच असे का विचारता, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक