शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:49 IST

पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे.

बंगळूरू : पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे. अपक्ष लोकप्रतिनिधीच मतदारसंघाची सेवा करू शकतो. अपक्षांची ताकद अजून मतदारांना कळलेली नाही, असे मत प्रख्यात अभिनेते व बंगळुरू (मध्य) मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांनी व्यक्त केले.एका मुलाखतीमध्ये प्रकाश राज यांनी राजकारणाबाबतची आपली भूमिका, राजकीय विचारसरणी, राजकीय पक्षांचा खासदारांवरील प्रभाव या बाबींवर मतप्रदर्शन केले. मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडतात. त्याने त्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची अपेक्षा असते. नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांना ते मत देत नाहीत. कारण ते नेते मतदारसंघातील समस्या सोडवत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.आपल्या उमेदवारीमुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होत आहे का? या प्रश्नावर त्यांनी कोणते पक्ष धर्मनिरपेक्ष व कोणते धार्मिक हे कोण ठरविणार, असा प्रतिसवाल केला. कॉँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवत असली, तरी ते सत्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीनंतर हा भ्रम दूर होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशामध्ये हिंदू दहशतवाद असल्याचेही ते म्हणाले.आधी तुम्ही निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले आणि आता रिंगणात उतरला आहात, असे विचारले असता, प्रकाश राज म्हणाले की, निवडणुकांविषयी सामान्यांची अलिप्तता दूर व्हावी, यासाठीच मी निवडणूक लढवत आहे. त्यासाठी आम्ही चौकसभा, लोकांशी संवाद यावर भर देत आहोत. निवडणुकीचा प्रचार आता संपेलही, पण माझा प्रचार यापुढेही सुरूच राहील.भाजप व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे एखाद्या विश्वस्त संस्थेचे वाटतात, त्यांनी काही ना काही देण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या वेळी दिलेल्या १५ लाखांच्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्नही प्रकाश राज यांनी भाजपचे नाव न घेता केला.>अभिनेतेही नागरिकचकमल हसन, रजनीकांत आणि तुम्हाला राजकारणात प्रवेश करावासा का वाटला, असा प्रश्न करता राज यांनी आम्हीही नागरिक आहोत आणि आम्हालाही राजकारणात येण्याचा हक्क असल्याचे सांगितले. डॉक्टर, वकील राजकारणात येतात, तेव्हा असा प्रश्न उपस्थित होत नाही, मग अभिनेत्यांबाबतच असे का विचारता, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक