शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात गुन्हेगारी वाढत असेल तर गुंतवणूक येणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2023 01:09 IST

दावोसला मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ गेले होते आणि कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. यात नाशिकच्या पदरी भोपळा पडला. राजकीय आरोप-प्रत्यारोपापेक्षा आपण नाशिककरांनी गुंतवणूकदार नाशिकमध्ये का येत नाही, याचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. २१ लाखांच्या या शहराला निसर्गाने भरभरून दिले आहे. हवामान आल्हाददायक आहे.

ठळक मुद्देपोलिस स्टेशनबाहेर फटाके फोडले जाताततब्बल ८ तास शेतकरी मालेगावात ठिय्या मांडूनराजकीय व शासकीय मंडळींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता

बेरीज वजाबाकी

मिलिंद कुलकर्णी

दावोसला मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ गेले होते आणि कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. यात नाशिकच्या पदरी भोपळा पडला. राजकीय आरोप-प्रत्यारोपापेक्षा आपण नाशिककरांनी गुंतवणूकदार नाशिकमध्ये का येत नाही, याचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. २१ लाखांच्या या शहराला निसर्गाने भरभरून दिले आहे. हवामान आल्हाददायक आहे. सुवर्ण त्रिकोणात शहर आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवत आणि पायाभूत सुविधांचा विचार न करता ज्या गती आणि पद्धतीने विकास केला जात आहे, तो पुढे गंभीर विषय बनणार आहे. अपघात, प्रदूषण या दोन्ही बाबींमध्ये नाशिकचे नाव अग्रक्रमावर आहे. गुन्हेगारीवर कुणाचा अंकुश आहे की, नाही असे वाटावे एवढी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. विधिमंडळात एका पोलिस निरीक्षकाविरोधात चर्चा होते, महिन्यानंतर त्यांची चौकशी सुरू होते, बदली होते आणि पोलिस स्टेशनबाहेर फटाके फोडले जातात, हे चित्र काय दर्शवते? पोलिस दलातील अनागोंदी तर नव्हे ना?बळीराजाच्या शक्तीचे दर्शन

जिल्हा बँकेच्या शेतकरी विरोधी कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोर्चातून बळिराजाच्या शक्तीचे दर्शन घडले. शरद जोशी यांची शेतकरी संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह इतर शेतकरी संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांची बँक असलेली जिल्हा बँक आता शेतकऱ्यांचे हित साधण्यापेक्षा शेतकऱ्यांचे तथाकथित नेते असलेल्या राजकीय मंडळींना सांभाळण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. या मोर्चातून तो दिसून आला. तब्बल ८ तास शेतकरी मालेगावात ठिय्या मांडून बसले होते. शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांनी संवेदनशीलता दाखवित मोर्चापूर्वी आदल्या रात्री आणि मोर्चातही शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. सहकारमंत्र्यांशी चर्चा करीत काही आश्वासने मिळविली. मुद्दल कर्जाच्या रकमेवर सहा ते आठ टक्के व्याज आकारणी करून भरपाई देण्यास मुदतवाढ देऊ, सक्तीची कर्जवसुली थांबवू, अशी आश्वासने पदरी पडली. ही पाळली न गेल्यास १६ फेब्रुवारीला शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार आहेत.आधी लॉजिस्टिक पार्क करा, नंतर श्रेय घ्या

निफाड साखर कारखान्याच्या अतिरिक्त जागेवर ड्रायपोर्ट होणार होता, तो का झाला नाही, याचा मोठा इतिहास आहे. त्या वादात न पडता ताजा विषय म्हणजे ड्रायपोर्टऐवजी आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क होणार आहे. त्याची पाहणी करण्यासाठी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंटचे सीईओ प्रकाश गौर आणि त्यांचे पथक येऊन गेले. त्यांनी जागेची पाहणी केली. लगतच्या सुकेणे रेल्वे स्टेशनला भेट दिली. अवघ्या ८ कि.मी. अंतरावर असलेल्या महामार्गावरदेखील ते जाऊन आले. ११० एकर जागेत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला रस्ते, रेल्वे आणि हवाईमार्गे जोडण्यासाठी आता सुधारित डीपीआर केला जाणार असल्याची माहिती या पथकाने दिली. या प्रकल्पासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या पाठपुरावा करीत आहे. मात्र त्या दक्षिण भारतात दौऱ्यावर असताना हे पथक आले आणि खासदार हेमंत गोडसे यांनी पथकासोबत जात पाहणी केली. त्यावरून श्रेयाच्या चर्चा रंगल्या. निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर यांनी या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांची जंत्री सादर केली.आदर्श आचारसंहितेची व्यवहार्यता तपासा

राज्यातील पाच ठिकाणी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका सुरू आहेत. सर्वच महसूल विभागात त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोणत्याही नवीन विकासकामांना मंजुरी मिळणार नाही, निविदा, कार्यादेश निघणार नाही, प्रारंभ होणार नाही, असे या आचारसंहितेचे स्वरूप आहे. मुळात शिक्षक व पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक असल्याने दोन लाखांपर्यंत मतदारांशी या निवडणुकीचा संबंध आहे. सर्वसामान्य मतदारांना या निवडणुकीचे सोयरसुतक नाही; पण आचारसंहिता संपूर्ण पाच जिल्ह्यांमध्ये लागू आहे. आधीच कोरोनामुळे दोन वर्षे विकासकामे ठप्प होती. यापुढे पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका येतील. म्हणजे सर्वकाळ आचारसंहिता राहील, अशीच चिन्हे आहेत. शेषन यांच्यासारख्या निवडणूक आयुक्तांची अशा वेळी आठवण येते. नियमांची व्यवहार्यता तर तपासायला काय हरकत आहे?वादाला आले नळावरच्या भांडणाचे स्वरूप

देवळालीच्या आमदार सरोज आहेर आणि तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्याला अक्षरश: नळावरील भांडणाचे स्वरूप आले आहे. तहसीलदार राजश्री अहिरराव व त्यांच्या भगिनी जलसंपदा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता अलका अहिरराव या दोघांविषयी आमदार सरोज आहेर यांचा आक्षेप आहे. देवळाली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तहसीलदार राजश्री अहिरराव या इच्छुक असून त्या शासकीय पदाचा उपयोग करीत मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबवितात, तर भगिनी अलका अहिरराव या आमदारांच्या विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम करीत असल्याचा आमदार सरोज आहेर यांचा आक्षेप आहे. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात तसेच पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी अहिरराव भगिनींवर जाहीर आरोप केले आहेत. अहिरराव भगिनींनी त्या आरोपांना उत्तर दिले नसले तरी राजश्री अहिरराव या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करीत भूमिका मांडत आहेत. हे भांडण थांबविण्यासाठी राजकीय व शासकीय मंडळींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक