शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

"पिझ्झा, बर्गरची होम डिलिव्हरी चालते, मग रेशनची का नको?" केजरीवालांचा मोदींना बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 14:17 IST

Delhi Politics News: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये घरपोच रेशन योजना सुरू करण्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला वाद वाढत आहे.

नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये घरपोच रेशन योजना सुरू करण्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला वाद वाढत आहे. यादरम्यान अरविंद केजरीवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दिल्लीमध्ये पुढील आठवड्यापासून घरपोच रेशन पुरवण्याचे काम सुरू झाले असते. सर्व तयारी झाली होती. मात्र अचानक केंद्र सरकारने यासाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगत परवानगी नाकारली, ही बाब चुकीची आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. याशिवाय अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आम्ही एकवेळ नाही तर पाच वेळा केंद्राची परवानगी घेतली आहे. कायदेशीररीत्या अशा परवानगीची आवश्यकता नाही. रेशनची होम डिलिव्हरी होण्यात गैर काय आहे. तुम्ही रेशन माफियांसोबत उभे राहणार असाल तर मग गरिबांसोबत कोण उभं राहील. त्या ७० लाख गरिबांचे काय होईल. ज्यांचे रेशन हे रेशन माफिया चोरून नेतात. अरविंद केजरीवाल म्हणाले की, या देशात जर स्मार्टफोन, पिझ्झाची होम डिलिव्हरी होऊ शकते. मग रेशनची का नाही. पंतप्रधान मोदीजी तुम्हाला रेशन माफियांबाबत एवढी सहानुभूती का आहे. त्या गरीबांची हाक कोण ऐकणार, केंद्राने कोर्टात आमच्या योजनेविरोधात आक्षेप घेतला नाही. मग आता ती योजना का फेटाळली जात आहे. अनेक गरीबांची नोकरी गेली आहे. लोक बाहेर पडू इच्छित नाहीत. त्यामुळे आम्ही घरपोच रेशन पुरवण्याचा विचार करत आहोत.  केंद्र सरकारकडून या क्रांतिकारी रेशन वाटप योजनेला रोखण्यात येत असल्याचा आरोप दिल्ली सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्राने या योजनेला अद्याप मंजुरी दिलेली नाही. तसेच कोर्टामध्ये या योजनेच्याविरोधात एक खटला सुरू आहे, असे कारण देत नायब राज्यपालांनी या योजनेची सुरुवात करण्याची फाइल फेटाळली आहे, असा आरोप दिल्ली सरकारने केला आहे.  घरपोच रेशन पुरवाठा योजनेवरून आधीही वाद झालेला आहे. ही योजना केंद्र सरकारच्या नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट अंतर्गत येते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा केवळ संसदेच्या माध्यमातून होऊ शकतो. राज्य सरकारकडून त्यात बदल करता येत नाही. त्यामुळे दिल्ली सरकार या योजनेचे नाव बदलू शकत नाही. तसेच या योजनेला कुठल्याही अन्य योजनेशी जोडता येणार नाही, अशा शब्दात केंद्राने आक्षेप घेतला होता.  

टॅग्स :delhiदिल्लीPoliticsराजकारणArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी