शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजी, नाराजीच्या लाटेत फसली भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:44 IST

सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले.

- साहेबराव नरसाळेसलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले. या पराभवाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांवर ढकलल्याने भाजपात गटबाजी उफाळली आहे़ हे वादळ शमले नसतानाच पराभूत नेत्यांवरच भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविल्याने आता ही ‘भारतीय पराभूत पार्टी’ झाली, अशी टीका नाराज करु लागले आहेत़आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ११ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे़ या मतदारसंघांची विभागणी रायपूर, बस्तर, बिलासपूर या तीन विभागांमध्ये केली जाते. त्यासाठी भाजपाने प्रभारी नियुक्त केले आहेत़ रायपूर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री राजेश मुनोत, बस्तर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री केदारनाथ कश्यप, बिलासपूर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री अमर अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे़ हे तीनही प्रभारी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत़भाजपाने प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने तिथे नाराजी आहे़ कौशिक यांची एकतर्फी निवड केल्याने काही आमदार नाराज आहेत. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवनारायण द्विवेदी यांनी राजीनामा दिला असून, ते काँगे्रसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत़काँगे्रसमधून बाहेर पडून जनता काँगे्रस पक्ष स्थापन केलेल्या अजित जोगी यांनाही बंडखोरांनी ग्रासले आहे़ जनता काँगे्रसचे वरिष्ठ नेते अब्दुल हमीद हयात व बृजेश साहू यांची बंडखोरीमुळे हकालपट्टी करण्यात आली़ याच पक्षाचे सियाराम कौशिक, चंद्रभान बारमते, चैतराम साहू, संतोष कौशिक हे नेते काँगे्रसच्या संपर्कात आहेत. ते २८ जानेवारी रोजी काँगे्रसमध्ये प्रवेश करतील, या शक्यतेला काँगे्रसचे प्रभारी पी़ एल़ पुनिया यांनी दुजोरा दिला आहे़लोकसभेच्या तयारीसाठी काँगे्रसच्या बैठका सुरु आहेत. पण विधानसभेतील विजयामुळे काँगे्रसमध्येही गटबाजी आहे़ ‘प्रत्येक पक्षात बंडखोरी असतेच’, असे सांगत आरोग्यमंत्री टी़ एस़ सिंहदेव यांनी ही समस्या आमच्याकडे असल्याचे मान्य केले. मात्र काँग्रेसमधील कोणीही नेता बंडखोरी करणार नाही, असा दावा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला.>एकाच जागेच्या विजयाचा इतिहास पुसणार?मध्यप्रदेशचे विभाजन करून नोव्हेंबर २००० मध्ये छत्तीसगडची निर्मिती करण्यात आली़ त्यानंतर काँगे्रसचे अजित जोगी हे पहिले मुख्यमंत्री झाले़ पण २००३ सालच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत भाजपने ५० जागा जिंकून काँगे्रसला धूळ चारली़मुख्यमंत्री झालेल्या रमण सिंह यांनी छत्तीसगडमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले़ महासमुंदमधून २००४ च्या लोकसभा निवडणुकीत महासमुंद अजित जोगी हे एकमेव काँगे्रस उमेदवार निवडून आले, तर २००९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला पुन्हा एकाच जागेवर रोखले़दुर्गमधून २०१४ साली दुर्ग काँगे्रसचे ताम्रध्वज साहू हे एकटेच विजयी झाले़ म्हणजेच तीन लोकसभा निवडणुकांत काँगे्रस एका जागेवरून पुढे सरकली नाही. या एका जागेचा इतिहास पुसण्याचे आव्हान काँगे्रसपुढे आहे़>जनता काँगे्रस व बसपाची युतीलोकसभेसाठी अजित जोगी यांची जनता काँगे्रस व बसपाची युती आहे़ जनता काँगे्रसला ७ व बसपाला ४ जागा असा फॉर्म्युला ठरला आहे़ याची माहिती जनता काँगे्रसने दिली़ मात्र, बसपाने त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chhattisgarhछत्तीसगड