शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात फोकस मराठवाडा, दहा जागांचे भवितव्य ठरणार १८ एप्रिलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:55 IST

दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाºया दुसºया टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान १८ एप्रिलला होणार आहे.

मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, खा. प्रीतम मुंडे, खा. आनंदराव अडसूळ आदी दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाºया दुसºया टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान १८ एप्रिलला होणार आहे. राज्याच्या १० मतदारसंघातील या निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे.अमरावती, सोलापूर आणि लातूर या तीन जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असून, सध्या त्या शिवसेना व भाजपच्या ताब्यात आहेत. बीडमध्ये प्रीतम मुंडे तर अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा या दोन प्रमुख महिला उमेदवार आहेत. दहापैकी तीन जागा विदर्भातील, सहा जागा मराठवाड्यातील असून, एक पश्चिम महाराष्ट्रातील आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहापैकी सात जागांची निवडणूक झाली. त्यामुळे फोकस विदर्भावर होता. आता दुसºया टप्प्यात मराठवाड्यावर फोकस असेल. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत.दुसºया टप्प्यातील दहा जागांपैकी सध्या भाजप-शिवसेनेचे नऊ ठिकाणी खासदार आहेत, तर नांदेडची एकच जागा काँग्रेसकडे आहे. नऊ जागा टिकविण्याचे आव्हान युतीसमोर असेल, तर ताकद वाढल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान हे महाआघाडीसमोर असेल.युतीचा विचार करता शिवसेना पाच (अमरावती, बुलडाणा, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली) तर भाजप पाच (अकोला, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर) जागा लढत आहे. महाआघाडीचा विचार करता काँग्रेस अकोला, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर या पाच जागा लढत असून, बुलडाणा, परभणी, बीड, उस्मानाबाद या चार जागा राष्ट्रवादी लढत आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील अमरावतीच्या जागेवर युवा स्वाभिमानीच्या नवनीत कौर राणा लढत आहेत. गेल्या वेळी त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या.वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघांतून लढत असून दोन्ही ठिकाणी १८ एप्रिलला मतदान होत आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या दोन्ही जागांसाठी (नांदेड, हिंगोली) या टप्प्यात मतदान होत आहे.>दुरंगी, तिरंगी सामनादहापैकी लातूर, नांदेड या दोन ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. अकोला आणि नांदेडमध्ये भाजप, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी असा तिरंगी सामना आहे. बुलडाणा, परभणी, उस्मानाबादमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादी असा सामना आहे. अमरावतीत शिवसेना विरुद्ध महाआघाडीच्या नवनीत राणा कौर (युवा स्वाभिमान) अशी चढाओढ आहे. हिंगोलीत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आहेत. या दहापैकी किमान चार ठिकाणी बहुजन वंचित आघाडीने चांगले आव्हान दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक