शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात फोकस मराठवाडा, दहा जागांचे भवितव्य ठरणार १८ एप्रिलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:55 IST

दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाºया दुसºया टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान १८ एप्रिलला होणार आहे.

मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, खा. प्रीतम मुंडे, खा. आनंदराव अडसूळ आदी दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाºया दुसºया टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान १८ एप्रिलला होणार आहे. राज्याच्या १० मतदारसंघातील या निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे.अमरावती, सोलापूर आणि लातूर या तीन जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असून, सध्या त्या शिवसेना व भाजपच्या ताब्यात आहेत. बीडमध्ये प्रीतम मुंडे तर अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा या दोन प्रमुख महिला उमेदवार आहेत. दहापैकी तीन जागा विदर्भातील, सहा जागा मराठवाड्यातील असून, एक पश्चिम महाराष्ट्रातील आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहापैकी सात जागांची निवडणूक झाली. त्यामुळे फोकस विदर्भावर होता. आता दुसºया टप्प्यात मराठवाड्यावर फोकस असेल. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत.दुसºया टप्प्यातील दहा जागांपैकी सध्या भाजप-शिवसेनेचे नऊ ठिकाणी खासदार आहेत, तर नांदेडची एकच जागा काँग्रेसकडे आहे. नऊ जागा टिकविण्याचे आव्हान युतीसमोर असेल, तर ताकद वाढल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान हे महाआघाडीसमोर असेल.युतीचा विचार करता शिवसेना पाच (अमरावती, बुलडाणा, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली) तर भाजप पाच (अकोला, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर) जागा लढत आहे. महाआघाडीचा विचार करता काँग्रेस अकोला, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर या पाच जागा लढत असून, बुलडाणा, परभणी, बीड, उस्मानाबाद या चार जागा राष्ट्रवादी लढत आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील अमरावतीच्या जागेवर युवा स्वाभिमानीच्या नवनीत कौर राणा लढत आहेत. गेल्या वेळी त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या.वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघांतून लढत असून दोन्ही ठिकाणी १८ एप्रिलला मतदान होत आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या दोन्ही जागांसाठी (नांदेड, हिंगोली) या टप्प्यात मतदान होत आहे.>दुरंगी, तिरंगी सामनादहापैकी लातूर, नांदेड या दोन ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. अकोला आणि नांदेडमध्ये भाजप, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी असा तिरंगी सामना आहे. बुलडाणा, परभणी, उस्मानाबादमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादी असा सामना आहे. अमरावतीत शिवसेना विरुद्ध महाआघाडीच्या नवनीत राणा कौर (युवा स्वाभिमान) अशी चढाओढ आहे. हिंगोलीत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आहेत. या दहापैकी किमान चार ठिकाणी बहुजन वंचित आघाडीने चांगले आव्हान दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक