शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: November 29, 2020 12:06 IST

कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक; हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशावर

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या लाठीमारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय. हे दुर्दैवी आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी आंदोलन करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. 'कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला दिली जाणारी वर्तणूक निषेधार्ह आहे. हे शेतकरी देशातले नाहीत, ते बाहेरून आले असावेत, अशी वागणूक त्यांना दिली जात आहे. रस्त्यावर उतरलेले बहुतांश शेतकरी पंजाब आणि हरयाणातून आलेले आहेत. त्यांना विभाजनवादी, खलिस्तानी म्हणणं हा त्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर आपण पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी म्हणत असाल तर याचा अर्थ आपण पंजाबमध्ये पुन्हा तोच काळ आणू इच्छिता. लोकांना आठवण करून देऊ इच्छिता की तुम्ही पुन्हा त्याच मार्गानं जावं. देशाच्या स्थिरतेसाठी हे चांगलं नाही,' अशी टीका राऊत यांनी केली. गेल्या चार दिवसांपासून हजारो शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना नवी दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर होत आहे. मात्र शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे. शेतकऱ्यांनी रस्त्याऐवजी मैदानात आंदोलन करावं. त्यानंतर सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असं आवाहन गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत