शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: November 29, 2020 12:06 IST

कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक; हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशावर

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या लाठीमारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय. हे दुर्दैवी आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी आंदोलन करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. 'कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला दिली जाणारी वर्तणूक निषेधार्ह आहे. हे शेतकरी देशातले नाहीत, ते बाहेरून आले असावेत, अशी वागणूक त्यांना दिली जात आहे. रस्त्यावर उतरलेले बहुतांश शेतकरी पंजाब आणि हरयाणातून आलेले आहेत. त्यांना विभाजनवादी, खलिस्तानी म्हणणं हा त्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर आपण पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी म्हणत असाल तर याचा अर्थ आपण पंजाबमध्ये पुन्हा तोच काळ आणू इच्छिता. लोकांना आठवण करून देऊ इच्छिता की तुम्ही पुन्हा त्याच मार्गानं जावं. देशाच्या स्थिरतेसाठी हे चांगलं नाही,' अशी टीका राऊत यांनी केली. गेल्या चार दिवसांपासून हजारो शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना नवी दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर होत आहे. मात्र शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे. शेतकऱ्यांनी रस्त्याऐवजी मैदानात आंदोलन करावं. त्यानंतर सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असं आवाहन गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत