शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: November 29, 2020 12:06 IST

कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक; हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशावर

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या लाठीमारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय. हे दुर्दैवी आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी आंदोलन करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. 'कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला दिली जाणारी वर्तणूक निषेधार्ह आहे. हे शेतकरी देशातले नाहीत, ते बाहेरून आले असावेत, अशी वागणूक त्यांना दिली जात आहे. रस्त्यावर उतरलेले बहुतांश शेतकरी पंजाब आणि हरयाणातून आलेले आहेत. त्यांना विभाजनवादी, खलिस्तानी म्हणणं हा त्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर आपण पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी म्हणत असाल तर याचा अर्थ आपण पंजाबमध्ये पुन्हा तोच काळ आणू इच्छिता. लोकांना आठवण करून देऊ इच्छिता की तुम्ही पुन्हा त्याच मार्गानं जावं. देशाच्या स्थिरतेसाठी हे चांगलं नाही,' अशी टीका राऊत यांनी केली. गेल्या चार दिवसांपासून हजारो शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना नवी दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर होत आहे. मात्र शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे. शेतकऱ्यांनी रस्त्याऐवजी मैदानात आंदोलन करावं. त्यानंतर सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असं आवाहन गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत