शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

“दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका, आडमुठी भूमिका योग्य नाही”; शिवसेनेने काँग्रेसला बजावलं

By प्रविण मरगळे | Updated: January 8, 2021 09:04 IST

Shiv Sena Congress: काँग्रेसनं कुणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु भाजपाच्या साथीने कोविड निधी रोखण्याचं काम त्यांनी केले आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.

ठळक मुद्देअद्यापही कोविडचं संकट कायम आहे, त्यासाठी उपाययोजना करण्यास निधीची गरज आहेभाजपाच्या भूमिकेला काँग्रेसने साथ दिली आणि बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला.कमळ चिखळात रुतलंय त्यात हात घालण्याचं काम विरोधी पक्षनेते करत आहेत

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीवरून काँग्रेस-शिवसेना यांच्यातील वाद सध्या पेटला आहे. यातच स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा ज्या पद्धतीने सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करत आहेत, माध्यमासमोर बोलतायेत त्यावरून कुठेतरी काँग्रेसला भाजपाच्या दावणीला बांधण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे असा आरोप जाधव यांनी पत्रकार परिषद घेत केला.

यावेळी यशवंत जाधव म्हणाले की, कमळ चिखळात रुतलंय त्यात हात घालण्याचं काम विरोधी पक्षनेते करत आहेत. माध्यमासमोर बोलत असताना ते साफ चुकीचं वक्तव्य करत आहेत. विरोधीपक्ष नेते सध्या संभ्रावस्थेत असून त्यांना नक्की कोणाचं ऐकायचं हा प्रश्न पडला आहे, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांचे ऐकायचं की प्रदेशाध्यक्षांचे? मंत्र्यांचे ऐकायचे की पालकमंत्र्यांचे? या द्विधावस्थेत विरोधी पक्षनेते आहेत. मागील निवडणूक आम्ही स्वबळावरच लढलो होते, त्यामुळे आम्हाला स्वबळ काय हे चांगले माहिती असून कोणीही दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका. आजही शिवसेना स्वबळावरच सत्तेत आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला बजावलं आहे.

आडमुठी भूमिका घेऊ नका

काँग्रेसनं कुणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु भाजपाच्या साथीने कोविड निधी रोखण्याचं काम त्यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते बेछूट आणि चुकीचे आरोप करत आहे. अद्यापही कोविडचं संकट कायम आहे, त्यासाठी उपाययोजना करण्यास निधीची गरज आहे. पण भाजपाच्या भूमिकेला काँग्रेसने साथ दिली आणि बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला. कोविड काळात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्याची चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. अहवाल आल्यानंतर कारवाई होईल. परंतु संकट अजुनही संपलेले नसताना आडमुठी भूमिका घेणे योग्य नाही असंही यशवंत जाधव यांनी काँग्रेसला सांगितले.

काँग्रेसच्या नगरसेविकेला बजावली नोटीस

पूर्वसूचना न देता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहिल्याप्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहॉ सिद्धीकी यांना चिटणीस विभागाने नोटीस पाठवली आहे. मात्र काँग्रेसने यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना जबाबदार धरले आहे. सिद्धीकी या मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भगिनी आहेत. हे काँग्रेस विरोधात षडयंत्र असून स्थायी समिती अध्यक्षांच्या दबावाखाली काम सुरू आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला.

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना