शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

Congress CWC Meeting: काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष? कार्यकारणी समितीची आज महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 09:13 IST

काँग्रेसच्या कार्यकारणीच्या या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो.

ठळक मुद्देजिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत निवडणूक पार पडेपर्यंत सोनिया गांधी अध्यक्षपदावर कायम असतील.पुढील वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाबसह अनेक महत्त्वपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह मागील वर्षी जी २३ गटाने पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यामुळे समोर आलं होतं

नवी दिल्ली – संसदेतील विरोधी पक्ष काँग्रेसच्या कार्यकारणीची सकाळी १० च्या सुमारास महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नवीन अध्यक्ष(Congress President) निवडीवर निर्णय घेतला जाऊ शकतो. काँग्रेस कार्यकारणीच्या या बैठकीत कुठल्याही शिस्तभंगाच्या कारवाईवर चर्चा होणार नाही. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत विचारविनिमय केला जाणार आहे. पक्षात सर्वांना सामावून घेण्याबाबत यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या कार्यकारणीच्या या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. यात अध्यक्ष पदासाठी निवडणूकही घेतली जाण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पक्षाचं अंतरिम अध्यक्ष बनवलं होतं. आजच्या कार्यकारणी बैठकीत अध्यक्षपदावर तोडगा काढला जाऊ शकतो. जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत निवडणूक पार पडेपर्यंत सोनिया गांधी अध्यक्षपदावर कायम असतील.

काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेत्यांच्या गटाने जी २३(G 23) ज्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा सहभागी आहेत त्यांनी पक्षातंर्गत निवडणुका घेण्याचा मुद्दा उचलला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक नेत्यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसनं सदस्यता अभियान सुरू करावं. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत निवडणुका घ्याव्यात. यात काँग्रेस पक्षाला पूर्णकालीन अध्यक्ष असावा यासाठीही निवडणूक घ्यावी. पुढील वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाबसह अनेक महत्त्वपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

तर काही नेत्यांचे म्हणणं आहे की, पक्षाचं लक्ष काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीऐवजी या राज्यातील निवडणुका जिंकण्याकडे जास्त असावं. काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह मागील वर्षी जी २३ गटाने पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यामुळे समोर आलं होतं. यात पक्षात बदल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. पक्षाला नेतृत्व आणि चेहरा द्यावा अशी मागणी पत्रात करण्यात आली होती. यातच काँग्रेससमोर सध्या पंजाब, छत्तीसगड यासारख्या राज्यातही संकट निर्माण झालं आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, सुष्मिता देव, लुइजिन्हो फलेरियो सारखे नेते पक्षाबाहेर पडले आहेत. काँग्रेसच्या युवा नेत्यांनी याआधीच पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करावेत असं काही नेत्यांना वाटत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी