शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Corona Virus: विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 05:43 IST

Corona Virus: सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा  उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवरील लस घेतली का, असा प्रश्न संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विचारला, तर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कोरोना महामारीविरोधातील लढाईत विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे आहे, असा आरोप केला. ते म्हणाले, लसीकरण मोहिमेत होईल तेवढे अडथळे ते निर्माण करीत आहेत. 

सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा  उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत. लसीकरण मोहिमेला खीळ घालण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधी पक्ष राजकारण करीत आहेत हे यातून दिसते.” १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचे ठरवले तेव्हा आरोग्य हा विषय राज्य सरकारांचा असल्याचा आणि राज्यांना लस प्राप्त करून घेऊन त्या वितरित करण्याची मुभा दिली जायला हवी असा विशिष्ट राग आळवला गेला.

विरोधकांनी मग भूमिकाच बदलली    प्रसाद यांनी म्हटले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी असे सुचविले होते की,  भारताची रचना ही संघराज्याची असून, आरोग्य हा राज्यांचा विषय आहे, त्यामुळे केंद्र सरकार त्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.    १२ मे रोजी सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसी या केंद्र सरकारने प्राप्त केल्या पाहिजेत, असे पत्र लिहिले होते.

प्रल्हाद जोशी म्हणाले...प्रल्हाद जोशी म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लस घेतलेली नाही. त्यांचा भारतीय लसीवर विश्वास नाही. आम्ही गेल्या जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. आता मात्र ते लस घेत आहेत.”  

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादcorona virusकोरोना वायरस बातम्या