शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Corona Virus: विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 05:43 IST

Corona Virus: सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा  उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवरील लस घेतली का, असा प्रश्न संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विचारला, तर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कोरोना महामारीविरोधातील लढाईत विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे आहे, असा आरोप केला. ते म्हणाले, लसीकरण मोहिमेत होईल तेवढे अडथळे ते निर्माण करीत आहेत. 

सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा  उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत. लसीकरण मोहिमेला खीळ घालण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधी पक्ष राजकारण करीत आहेत हे यातून दिसते.” १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचे ठरवले तेव्हा आरोग्य हा विषय राज्य सरकारांचा असल्याचा आणि राज्यांना लस प्राप्त करून घेऊन त्या वितरित करण्याची मुभा दिली जायला हवी असा विशिष्ट राग आळवला गेला.

विरोधकांनी मग भूमिकाच बदलली    प्रसाद यांनी म्हटले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी असे सुचविले होते की,  भारताची रचना ही संघराज्याची असून, आरोग्य हा राज्यांचा विषय आहे, त्यामुळे केंद्र सरकार त्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.    १२ मे रोजी सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसी या केंद्र सरकारने प्राप्त केल्या पाहिजेत, असे पत्र लिहिले होते.

प्रल्हाद जोशी म्हणाले...प्रल्हाद जोशी म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लस घेतलेली नाही. त्यांचा भारतीय लसीवर विश्वास नाही. आम्ही गेल्या जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. आता मात्र ते लस घेत आहेत.”  

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादcorona virusकोरोना वायरस बातम्या