शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

काँग्रेसची मदार मोदींविरोधी (सुप्त) लाटेवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:43 IST

पुण्यातल्या मतदानाला आता दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.

- सुकृत करंदीकरपुण्यातल्या मतदानाला आता दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. उमेदवार ‘निष्ठांवत’ हवा की ‘बाहेरचा’, ‘अमुक’ जातीचा सोईस्कर ठरेल की ‘तमूक’ जातीचा’ हा निर्णय घेण्यातच काँग्रेसने पुष्कळ वेळ खर्च केला. पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम यासारख्या पुण्याबाहेरच्या मंडळींनी पुण्यातल्या काँग्रेसची काळजी करावी, अशी निर्णायकी अवस्था पुण्याच्या काँग्रेसने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.दुसरीकडे प्रतिस्पर्धी भाजपचा प्रचार खूप लवकर आणि पद्धतशीरपणे सुरू झाला आहे. दोन्हीकडील कागदोपत्री ताकदीमध्येही कमालीची विषमता असल्याचा परिणाम प्रचारात जाणवतो आहे. भाजपचे मित्रपक्ष शिवसेना, रिपाइं यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात जोमाने सहभागी झालेले दिसतात. काँग्रेसचा मुख्य मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते यांचे जास्त लक्ष शेजारच्या मावळ आणि बारामती मतदारसंघात केंद्रित झाले आहे. भाजपच्या बाजूने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या प्रचारसभा एव्हाना पुण्यात झाल्या आहेत. पुण्याच्या काँग्रेसने मागणी करूनही त्याची वरिष्ठ पातळीवर अद्याप दखल घेतलेली दिसत नाही. परिणामी, शहर काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या पातळीवर बाजू सांभाळत आहेत. पुण्यालगत पण बारामती मतदारसंघात येणाऱ्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा काल सभा झाली. वातावरण निर्मितीसाठी ही सभा काँग्रेसला उपयोगाची ठरू शकेल.

भाजपचे उमेदवार गिरीश बापट यंदा त्यांच्या कारकिर्दीतली दहावी निवडणूक लढत आहेत. यातल्या आठ निवडणुका त्यांनी जिंकल्या आणि एकदाच ते पराभूत झाले. काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यापूर्वी एकदाच लढले व त्यात पराभव स्वीकारला. निवडणुकीचे व्यवस्थापन आणि जिंकण्यासाठीची साधने व मनुष्यबळ या तयारीत भाजपने तूर्तास आघाडी घेतली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशात सुप्त लाट असून मतदानातून ती व्यक्त होईल, या गृहीतकावर काँग्रेसचा प्रचारातील उत्साह टिकून आहे. पक्षांतर्गत नाराजी उफाळून येऊ नये व कोणी गाफील राहू नये याची काळजी भाजप घेत आहे. पुणेकरांचा कौल मात्र पंतप्रधान कोण, यासाठी असणार आहे. त्यामुळे प्रचारात केंद्र सरकारच्या कामगिरीची चर्चा अधिक होत आहे.
>अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांना भाजप सरकारने गती दिली. पुणे आणि पीएमआरडीए अंतर्गत वीस हजार कोटींची कामे, जायका, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्गाची मिळून २० हजार कोटींपेक्षा जास्त कामे तसेच पुणे मेट्रोची कामे गेल्या फक्त पाच वर्षांत सुरू झाली. हा विकास पुणेकरांना डोळ्यांनी दिसतो आहे.- गिरीश बापट, भाजप>पुण्याच्या विकासाच्या बाबत खोटी माहिती देऊन प्रचारात फेकुगिरी चालवली आहे. पुण्यातल्या स्मार्ट सिटीसाठी केंद्राने जेमतेम तीनशे कोटी रुपयेच दिले. खात्यात १५ लाख जमा झाले का, रोजगार मिळाला का, मेट्रो पुण्यातून धावली का? या सगळ्यांची उत्तरे ‘नाही’ आहेत. एकहाती सत्ता असूनही भाजपने काही केलेले नाही.- मोहन जोशी, कॉँग्रेस>कळीचे मुद्देलोकसंख्या, अर्थकारणाच्या दृष्टीने राज्यातले दुसरे शहर असणाºया पुण्यात नागरी सुविधांच्या आवश्यक योजना आणि प्रकल्पांची गेल्या अनेक वर्षांत अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे वाहतूककोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, शहरातून वाहणाºया मुठा नदीची स्वच्छता या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019pune-pcपुणेLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स