शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

'केंद्रात सरकार स्थापनेकडे कॉँग्रेसची वाटचाल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 03:40 IST

कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांना विश्वास

कैमगंज (उत्तर प्रदेश) : केंद्रात तिसऱ्यांदा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार स्थापन करण्याच्या मार्गाकडे कॉँग्रेस वाटचाल करीत आहे. निवडणुकीतील आमच्या पक्षाची कामगिरी अनेकांच्या अपेक्षेपेक्षा खूप पलिकडची असेल, असे कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी बुधवारी सांगितले.कॉँग्रेसच्या उत्तर प्रदेश विभागाचे सलमान खुर्शीद दोनदा प्रमुख होते. फारुखाबादमधून सलमान खुर्शीद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. खुर्शी म्हणाले की, २००९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात कॉँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. तशीच कामगिरी यंदाही झाली, किंवा त्यापेक्षा अधिक चांगले निकाल हाती आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. यंदा या जागांचा टप्पा गाठून आम्ही त्याही पलिकडे गेलो, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या वेळी लागणाºया उत्तर प्रदेशातील निकालांमधून अनेक प्रकारची आश्चर्ये जनतेला पहायला मिळणार आहेत, याची मला खात्री वाटते.प्रियांका गांधी यांनी अलिकडेच पक्षात सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारली. त्या प्रचारात सक्रिय झाल्या. या निवडणुकीत प्रियांका गांधी फॅक्टरटचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांच्या प्रचारसभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. प्रियांका जेथे जात आहेत, तेथे त्यांच्या स्वागतासाठी जी गर्दी होत आहे. ती केवळ उत्सुकतेपोटी नाही. जनतेचा हा उत्साह आणि प्रतिसाद पाहता पक्षाचे बळ निश्चितच वाढेल, अशा माझा विश्वास आहे, असे खुर्शीद यांनी नमूद केले.केंद्रामध्ये यूपीएचे सरकार येण्याबाबतच्या शक्यतेविषयी खुर्शीद म्हणाले की, सरकार स्थापनेबाबत आपण आशावादी आहोत. प्रत्येकाला ती अपरिहार्यता वाटते. सरकारची रूपरेषा कशी असू शकेल, हा वादाचा मुद्दा असू शकेल, मात्र २३ मे रोजी हाती येणाºया निकालानंतर आम्ही यूपीए सरकारच्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळेल. देशाला गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या भयावह अनुभवातून जावे लागले, त्या पासून देशाला मुक्तता हवी आहे. ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते नव्या नेतृत्वामुळे उत्साहाने भारावून गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक उत्तम असे आम्ही काही करुन दाखवू. सर्व पक्षांपेक्षा आम्ही पुढे असू शकतो. खरोखर आम्ही सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीपर्यंत जाऊ शकतो. (वृत्तसंस्था)आम्ही दिलेली आश्वासने पाळतोकॉँग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेमुळे आमचा पक्ष भूतकाळात दिलेली आश्वासने पाळतो, केवळ हवेत इमले रचत नाही, यावर जनतेचा विश्वास बसला आहे, अशी पुस्तीही खुर्शीद यांनी जोडली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी