शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

'केंद्रात सरकार स्थापनेकडे कॉँग्रेसची वाटचाल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 03:40 IST

कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांना विश्वास

कैमगंज (उत्तर प्रदेश) : केंद्रात तिसऱ्यांदा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार स्थापन करण्याच्या मार्गाकडे कॉँग्रेस वाटचाल करीत आहे. निवडणुकीतील आमच्या पक्षाची कामगिरी अनेकांच्या अपेक्षेपेक्षा खूप पलिकडची असेल, असे कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी बुधवारी सांगितले.कॉँग्रेसच्या उत्तर प्रदेश विभागाचे सलमान खुर्शीद दोनदा प्रमुख होते. फारुखाबादमधून सलमान खुर्शीद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. खुर्शी म्हणाले की, २००९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात कॉँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. तशीच कामगिरी यंदाही झाली, किंवा त्यापेक्षा अधिक चांगले निकाल हाती आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. यंदा या जागांचा टप्पा गाठून आम्ही त्याही पलिकडे गेलो, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या वेळी लागणाºया उत्तर प्रदेशातील निकालांमधून अनेक प्रकारची आश्चर्ये जनतेला पहायला मिळणार आहेत, याची मला खात्री वाटते.प्रियांका गांधी यांनी अलिकडेच पक्षात सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारली. त्या प्रचारात सक्रिय झाल्या. या निवडणुकीत प्रियांका गांधी फॅक्टरटचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांच्या प्रचारसभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. प्रियांका जेथे जात आहेत, तेथे त्यांच्या स्वागतासाठी जी गर्दी होत आहे. ती केवळ उत्सुकतेपोटी नाही. जनतेचा हा उत्साह आणि प्रतिसाद पाहता पक्षाचे बळ निश्चितच वाढेल, अशा माझा विश्वास आहे, असे खुर्शीद यांनी नमूद केले.केंद्रामध्ये यूपीएचे सरकार येण्याबाबतच्या शक्यतेविषयी खुर्शीद म्हणाले की, सरकार स्थापनेबाबत आपण आशावादी आहोत. प्रत्येकाला ती अपरिहार्यता वाटते. सरकारची रूपरेषा कशी असू शकेल, हा वादाचा मुद्दा असू शकेल, मात्र २३ मे रोजी हाती येणाºया निकालानंतर आम्ही यूपीए सरकारच्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळेल. देशाला गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या भयावह अनुभवातून जावे लागले, त्या पासून देशाला मुक्तता हवी आहे. ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते नव्या नेतृत्वामुळे उत्साहाने भारावून गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक उत्तम असे आम्ही काही करुन दाखवू. सर्व पक्षांपेक्षा आम्ही पुढे असू शकतो. खरोखर आम्ही सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीपर्यंत जाऊ शकतो. (वृत्तसंस्था)आम्ही दिलेली आश्वासने पाळतोकॉँग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेमुळे आमचा पक्ष भूतकाळात दिलेली आश्वासने पाळतो, केवळ हवेत इमले रचत नाही, यावर जनतेचा विश्वास बसला आहे, अशी पुस्तीही खुर्शीद यांनी जोडली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी